Sunday, December 20, 2020

गमंत जमंत

24/01/2020


नमस्कार मंडळी 
मी आकांक्षा  कुलकर्णी 
sorry sorry sorry sorry
थांबा हं 1 मिनिट 

( अंगावर शेला पांघरुन घेत )
नमस्कार मंडळी ,
आम्ही आकांक्षा कुलकर्णी ,
नवरदेवाच्या भगिनी आहोत आम्ही. उद्या आमच्या  दादासाहेबांचा विवाह आहे. त्यानिमीत्त इथे उपस्थित मंडळींच आम्ही  कुलकर्णी-देशपांडे  कुटुंबीयांच्या वतीने स्वागत करतो. 
आमच्याघरी सध्या खुप आनंदी वातावरण आहे . दादासाहेब आणि वहिनीबाईसाहेब फक्त भेटीची संधी शोधत असतात . अगदी सुरुवातीला , नविन आसतांना त्यांना आमची खुप गरज पडली हो  . पण आता,  चुकवत आहेत हो दोघेही आम्हांला  , समजतं आम्हांला सारं. पण आम्हांला भारी मौज येते हो  हे सारं पहायला. आमच्या दादासाहेबांच कसं सगळंच आगळवेगळं असत . मग आम्ही पण नाही मागे हटत .पहा मग मजा सांगते आपल्याला  .
विवाह म्हणलं की आनंदाला कसं उधाण येत असतं . तसच काहीसं आमच्याही वाड्यावर चाललंय . चर्चांना , नियोजनांना आणि स्वप्न रंगवायला अगदी भरतं आलयं . आपणही चला जरा आमच्या वाड्यात  . ऐकुयात आमच्या मातोश्री आणि पिताजी यांच काय चाललंय ते. या  जरा तुम्हीपण डोकावायला.




25/01/2020


अनिल -  
 या !! सरिताबाई , जरा बसा निवांत . भलतीच धावपळ चालु आहे तुमची.

सरिता-  
हो. सगळं कसं ठरल्याप्रमाणे पार पडलं म्हणजे निवांत वाटेल हो आम्हांस . आशिषरावांच्या लग्नासाठी बार्शीगावाहुन व-हाडी मंडळी घेऊन प्रस्थान केलं आपण. ते मिरजगावला पोहोचेपर्यंत जिवास स्वस्थता नव्हती हो आमच्या . आधीच लांब पल्याचा प्रवास करुन थकवा आलेला अशी सगळी पाहुणे मंडळी , तर काही जेष्ठ मंडळी ,लहान मुलं कोणाला वाटेत त्रास होऊ नये याची खबरदारी घेत होतो आम्ही .

अनिल- 
हं ! पण काळजी नसावी . आपण निश्चिंत असावे. सारं कसं ,ठरल्याप्रमाणे होईल हो.

सरिता- 
इकडच्या स्वारींनी खबरदारी घेतलीय , हे जाणतो  हो आम्ही . तसं मिरजगावला पण व्याह्यांनी कशी चोख व्यवस्था ठेवलीय. पण उद्याचा विवाहसोहळा पार पडेपर्यंत ,  आम्हांस स्वस्थता नाही वाटणार हो .

अनिल- 
तेही खरच आहे म्हणा. स्वभावाला औषध नसते.

सरिता- 
काय म्हणालात ?

अनिल - 
काहीच नाही

सरिता- 
तिकडे आशिषराव आणि कीर्तीबाईंच्या उत्साहाला ,  उधाण आलय आगदी. त्यांचही बरोबरच आहे म्हणा. सततची मोहिम असते हो दोघांचीपण. तितकीच कामाची व्यस्तता . त्यात वेळ काढुन एकमेकांना भेटायचं ,  बोलायचं , एकमेकांना  बिना खलित्याचे कसलेशे मजकूर पाठवायचे,  या  सा-यासाठी सतत संधी शोधत असतात दोघेपण . आता होतील जरा निवांत  .

अनिल - 
हो नं . नवनविन लागलेल्या शोधांच्या माध्यमातून, अंगावर पडलेली जबाबदारी , अगदी चोखपणे पार पाडत आहेत हो दोघेही . सुनबाई कसलीशी यंत्रसामग्री हाताळतात.  तर चिरंजीव , काहीतरी हलत खोक समोर ठेऊन ,त्यात एकटेच वार करत बसलेले असतात.

सरिता-
 हो बाई ! मला भारी मौज वाटते त्याची. नविन शोधांच म्हणाल तर हेच पहा  न मौज म्हणून आपण काय केलं विवाहानंतर ? तर हौदात पाय सोडुन उडती कारंजे पहात बसलो होतो !  आता आशिषराव आणि कीर्तीबाई  , हे दोघेजण म्हणे कसल्याशा बग्गीत बसुन, उंच हवेतुन स्वच्छंदी विहार करणार म्हणे. भारी मौज वाटते बाई मला.

अनिल- 
सरिताबाई भानावर या . सुनबाईंना घेऊन चिरंजीव निघालेत. आपल्याला उद्याच्या सोहळ्याच , व-हाडी मंडळीच पहाव लागेल . मग करु , आपणही हवेत विहार.

सरिता - 
ईश्श ! काहीही हं. 

आनिल- 
चला पाहुणे मंडळींना बोलु जरा

आनिल-
नमस्कार मंडळी ! आजच्या व उद्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे इथे स्वागत आहे.सर्वांनी चहा न्याहरी व  भोजनाचा अस्वाद घ्यावा.

 
सरिता-
 या मेजवानी बरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याचाही आपण आस्वाद घ्यावा वआमचा आनंद द्वीगुणीत करावा ही विनंती .धन्यवाद !!


No comments:

Post a Comment