Tuesday, December 23, 2025

हार्मोनियम विशारद

  *हार्मोनियम विशारद होण्याचा परमोच्च आनंद शेवटी मिळाला*

22/06/2025

 दुपारी संगीत परीक्षेचा रिझल्ट लागला आणि 
" कुठे आहात ? हार्मोनियम विशारद झालात तुम्ही , बँकेतून घरी जातांना पेढे घेऊन या क्लासमध्ये "
असा अगदी उत्साहात आमच्या श्री. स्वामी समर्थ संगीत क्लासेसच्या प्राचार्या सौ. दीपाली सहस्त्रबुद्धे यांचा फोन आला . ते ऐकले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला . कारण याहीवेळी थोडी धाकधुक होती पण काही का असेना अनेक वर्षापासून मी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं होतं . तसं तर हार्मोनियम वाजवायला माझी सुरुवात खूपच मजेशीरपणे झाली होती.
     आशिष लहान असताना त्याचे मित्र तबल्याच्या क्लासला जातात म्हणून तो म्हणाला 
"आई मी तबल्याचा क्लास लावणार आहे ."
 तो क्लासला जाऊ लागला आणि तो गाणं पण छान म्हणायचा . आकांक्षा खुपच लहान होती ती पण त्याच्याबरोबर गाणे म्हणायची तेव्हा तिचा पण आवाज गोड आहे हे मला जाणवले . आमच्या घराजवळ आमच्याच बँकेतील पी. डी. देशपांडे राहात होते ते तबला वाजवायचे आणि त्यांची मुलगी गाणं गायची . त्यांच्याकडे माझं जाणं येणं होतं त्या दोघांना पाहून मला त्याचं फार अप्रूप वाटे , त्या बापलेकीच्या गाण्याची आणि तबला वाजवण्याची बँकेतपण खूप चर्चा व्हायची . त्यांच्या मुलीने छोट्या मुलांसाठी गाण्याचा क्लास सुरु केला मग मी आकांक्षाला तिच्याकडे गाण्याचा क्लास लावला . एकदोन महिन्यात ती म्हणाली
" काकू आता बाबांची बदली होणार मग आम्ही तळेगावला शिफ्ट होणार आहोत . आकांक्षाचा आवाज खूप गोड आहे तिचे गाणे सुरु ठेवा . माझे एक गुरुबंधू आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे म्हणून आम्ही गायन एकत्र शिकलो आहोत परवाच त्याचं लग्न झाले आहे त्याची बायको पण संगीत विशारद आहे आणि त्यांनी आता नवीनच संगीत क्लासेस सुरु केले आहेत तुम्ही त्यांना भेटा ."
आकांक्षा शिशुविहारला जात होती तिच्या मॅडमना पण तिचा आवाज गोड आहे हे लक्षात आले होते त्यांनी पण मला आवर्जून बोलावले आणि म्हणाल्या
" आकांक्षाचा आवाज छान आहे , आपल्या शाळेतील सहस्त्रबुद्धे मॅडमना तुम्ही भेटा गाण्याच्या बाबतीत त्या तुम्हाला माहिती देतील आणि मार्गदर्शन पण करतील . "
मी त्यांच्याकडे गेले ,सहस्त्रबुद्धे मॅडम आणि त्यांचे मिस्टर नेहमीच आमच्या बँकेत यायच्या त्यामुळे माझा त्यांचा चांगला परिचय होता , मी त्यांच्याकडे गेले . त्यांना लहान मुलांच्या गुणाचे भारी कौतुक होते लगेच प्रेमाने आकांक्षाला जवळ घेत त्या म्हणाल्या 
" अहो खरंच आकांक्षाचा आवाज खूप छान आहे , मी ऐकले आहे तिचे गाणे , तुम्ही तिला गाण्याच्या क्लासला घाला . माझ्या मुलाने संगीत क्लासेस सुरु केलेले आहेत . आत्ताच त्याचं लग्न झाले आहे आणि माझी सून पण विशारद आहे . दोघांनी मिळून क्लास सुरु केलाय जावा तुम्ही त्यांच्याकडे छान तयारी करून घेतील ते . " 
शाळेत तसेच आमच्या दोघांच्याही बँकेत त्या नेहमी यायच्या त्यामुळे आमची त्यांची चांगली ओळख होती .
त्यांनी पण मला त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या गाण्याच्या क्लासबद्दल अगदी भरभरुन सांगितले . या मॅडम पी. डी. देशपांडे या दोघांच्याही अगदीच जवळचा क्लास निघाला त्यामुळे मला जरा घरचेच असल्यासारखे वाटले आणि मी आकांक्षाला घेऊन क्लासमध्ये गेले . 
" श्री. स्वामी समर्थ क्लासेस 
प्राचार्या सौ. दिपाली सहस्त्रबुद्धे आणि श्री. प्रसाद सहस्त्रबुद्धे "
मी क्लासमध्ये गेले , अगदी हसतमुखाने दोघांनी आमचं स्वागत केलं . त्या दोघांशी मी चर्चा केली मला मॅडमचा मुलगा एकदम मनमोकळा वाटला तर सून थोडीशी स्ट्रिक्ट वाटली कदाचित नवीनच लग्न झालेलं होतं त्यामुळे असेल कदाचित असे मला वाटले . मी आकांक्षाचा क्लास सुरु केला आणि तिचं गाणं सुरु झालं . रोज जाण्याने ओळख वाढत गेली मग आकांक्षाला क्लासला न्यायचं आणायचं हे काम करताना मधला वेळ कुठे घालवायचा म्हणून मी क्लासमधेच बसू लागले . मला पण गाण्याची भरपूर आवड होती मी तानसेन नसले तरी कानसेन होते . मला क्लासमध्ये बसायला खूप आवडलं , त्या नवीन जोडप्याने क्लासचा जम फार सुरेख बसवला होता . एकमेकांचा आदर करत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते , क्लासमध्ये मी रमत होते , मला ते वातावरण खूप भावले आणि असं वाटलं की आपण गाणं गाऊ शकलो नाही तरी पेटी नक्कीच वाजवू शकू . आणि थोड्याच दिवसात बसून राहण्याऐवजी मी पेटीचा क्लास लावण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी माझं पेटी वादन सुरु झाले !
      क्लास नवीन असल्यामुळे परीक्षा केंद्र अजून नव्हते . क्लासमध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी होते आहे , त्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत , हे लक्षात घेत परांडा केंद्रातून आमचे फॉर्म भरुन घेऊन सर्वाना परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले गेले . त्यादरम्यान आकांक्षाच गाणं आणि माझं पेटी वादन सुरु राहिलं मला त्यात आवड निर्माण झाली , घरी प्रॅक्टिस करता यावी म्हणून मी पेटी खरेदी केली . आमच्या दोघींच्या पण तीन-तीन परीक्षा झाल्या आणि त्याच वर्षी आकांक्षाच्या मैत्रिणी भरतनाट्यमच्या क्लासला जाऊ लागल्या , तिचा कल तिकडे ओढ घेऊ लागला , तिचा शाळेतील अभ्यास वाढला एमटीएस , स्कॉलरशिप , चित्रकला असे अनेक उपक्रम वाढले आणि तिला गाण्याला वेळ कमी पडू लागला पर्यायाने तिचं गाणं बंद झालं , तिचा क्लास बंद झाला पण माझे क्लासबरोबर छान सुरु जुळले होते , छान ग्रुप तयार झाला होता त्यामुळे माझं पेटी वादन तसेच सुरु राहिले ! मी अगदी तन्मयतेने अभ्यास करू लागले . तोवर क्लासला पाच परीक्षा पर्यंत केंद्राची मान्यता मिळाली आणि मी आमच्या केंद्रातून परीक्षा दिली . पुढेपुढे अभ्यासक्रम पण वाढत गेला आणि माझी गोडी पण तेवढीच वाढत गेली . क्लासचा ग्रुप वाढत गेला , माझ्या वेळेप्रमाणे मी क्लासला जाऊ लागले अभ्यास करु लागले सर आणि मॅडम दोघांनी मला खूप मार्गदर्शन केले मुख्य म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे मला ऍडजस्ट करून मिळत होते त्यामुळे मी 2009 मध्ये मी उपांत्य विशारद झाले . पुन्हा ही परीक्षा परंडा केंद्रातून दिली , आता अजून दोन परीक्षाची केंद्र मान्यता मिळणे बाकी होते आणि विशारदचा अभ्यासक्रम पण भरपूर होता विशारद पुर्णचे सर्व राग मी शिकले आणि त्या दोघांना म्हटलं 
" आपल्या क्लासला आता विशारद पर्यंताच्या परीक्षा केंद्राची मान्यता मिळवून घ्या तोवर मी विशारदचा जरा सखोल अभ्यास करेन आणि आपल्याच केंद्रातून हार्मोनियमची विशारद होईन एखाद्या वर्षाचा गॅप घेईन ."
     आणि गॅप घेतला ही माझी चूक झाली , 2010 नंतर माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या घरात काहीबाही अडचणी आल्या , जबाबदाऱ्या वाढल्या मुख्य म्हणजे बँकिंग बदलले , बँकिंगमध्ये ड्रास्टिक चेंज झाला , वातावरण बदलले कामाचे प्रेशर वाढले , मी संघटनेत सक्रियपणे काम करायला सुरुवात केली मग वेळ अपुरा पडू लागला परिणामी
 माझा क्लास बंद झाला आणि पेटीची प्रॅक्टिस पण बंद झाली घरी वाजवत असे पण सहजच . पण क्लास बरोबर माझी नाळ जोडलेली राहिली गेली मधून अधून जात असे . क्लास सुरु होता तेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त गाण्याच्या साथीला पेटी वाजवली जायची पण क्लास बंद झाला आणि माझं वादन थोडसं दुर्लक्षित झालं . अशीच 8/10 वर्षें निघून गेली ......
   त्यानंतर 2020 मध्ये कोरोनानी सर्वांनाच घरी बसवलं . प्रत्येक जण आपापली करमणूकीची काहीतरी साधने शोधू लागले तसं मी पण माझी पेटी वर काढली आणि रोज वाजवू लागले त्या दरम्यान मुले घरी होती ती म्हणायची
 " आई तू उपांत्य विशारद झाली आहेस फक्त एका परीक्षेत का अडकवलेस आहेस ? एक परीक्षा दे आणि विशारद हो म्हणजे पदवी तरी मिळेल ". 
पण मी काही फारसे मनावर घेतले नाही . विरंगुळा म्हणून एकटीच वाजवत बसे . कोरोना नंतर 2021 मध्ये मुलांनी गंमत केली माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सरांना संपर्क साधून कीर्तीने माझ्यासाठी मोठी नवीन पेटी मिरजेतून तयार करुन घेतली आणि आकांक्षाने तालयंत्र खरेदी केली आणि दोघींनी मिळून मला ते सरप्राइज प्रेझेंट दिलं आणि 
" आता मात्र विशारद झालंच पाहिजे ! " 
अशी प्रेमळ धमकी दिली मी मनाची तयारी केली पण पुन्हा काकी गेल्या लगेच काका गेले मी गुरफटतच गेले . माझा क्लास काही सुरु झाला नाही , मधूनच आशिष चिडवे 
" काय मग विशारद मॅडम कधी होता विशारद ".
मी हसून म्हणे 
" काही खरं नाही बघ मला वेळच मिळत नाही ".
     अचानक डिसेंबर 2024 मध्ये एक दिवस मला व्हाट्सअप वर एका ग्रुपला ऍड केलेलं दिसल . ग्रुपचं नाव होतं . 
" श्री स्वामी समर्थ संगीत क्लासेस "
आणि त्यावर सहस्त्रबुद्धे सरांचा एक मेसेज होता .
*"🙏श्री स्वामी समर्थ संगीत क्लासेस , बार्शी.*
स्थापना - ५ जून २०००
क्लासचे सर्व आजी-माजी सदस्य यांना कळविण्यात येते की , आपल्या क्लासचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने क्लासच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा आणि संगीत मैफिल २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
तथापी आपल्या सोबत कोण-कोण क्लासला येत होते त्यांचे संपर्क क्रमांक या ग्रुपला जोडावेत. जेणे करून ते सर्व संपर्कात येतील.
🙏 धन्यवाद ".

 हा मेसेज वाचला आणि मला मनातून खूप आनंद झाला मी बँकेतून येताना आज क्लासला जायचंच असे ठरवलं . आणि दिवसभर माझ्या डोळ्यासमोर तो मेसेज तरळत होता . 25 वर्षांपूर्वीचा दिवस आठवत होता जेव्हा मी पहिल्यांदा क्लासला गेले होते , छोटेसे रोपट होतं ते ! आज त्याचा वटवृक्ष झालेला होता शेकडो विद्यार्थी तिथून संगीत कला अवगत करून गेले होते बँक संपल्यानंतर मी सरळ क्लास गाठला . सर आणि मॅडम होते आम्हाला सर्वांनाच एकमेकांना भेटून खूप आनंद झाला . मी त्यांना सांगितले 
" मी आता क्लास जॉईन करणार आहे , क्लासला 25 वर्षे झाली आहेत मी क्लास जॉईन करुन पण पंचवीस वर्षे झाली आहेत आणि 2025 साल सुरू होईल तर यावर्षी मला विशारद पूर्ण करायचा आहे होऊ शकेल का "?
लगेच त्या दोघांनी सांगितले 
" आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करु , तुमचा गॅप भरपूर पडलेला आहे शर्थीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील ." 
 माझ्या वेळेचा भरोसा नसल्याचे मी सांगितले . तर 
" तुम्हाला जमेल तसें या आपण करुन घेऊ ".
अशी नेहमीप्रमाणे खुली कमिटमेन्ट त्यांनी मला दिली आणि मी लगेच क्लास जॉईन केला . पहिल्या परीक्षेपासूनचा पुर्ण अभ्यासक्रम होता . सगळे मटेरियल माझ्याकडे होते पण प्रॅक्टिस नव्हती मग एप्रिलची टर्म जाऊ दिली पुन्हा डिसेंबर टर्म सुरु झाली आणि फॉर्म भरायचा दिवस आला !  वर्षभरामध्ये क्लासबरोबर पुन्हा शास्त्रीय संगीताबरोबर श्रावणधारा , नवरात्र , दिवाळी पहाट या कार्यक्रममानिमित्त प्रॅक्टिस व्हायची मी मला हवा तेवढा वेळ प्रॅक्टिससाठी क्लासमध्ये बसत असे . प्रत्यक्ष कार्यक्रमात पण साथ करण्याची संधी मिळाली . त्याचा मला परमानंद होई . पण परीक्षेचे टेंशन वेगळेच होते .
मी 2025 साली , क्लासच्या आणि माझ्या शिक्षण्याच्या 25 व्या वर्षी विशारद व्हायचं हे अगदी छातीठोकपणे घोषित केले होते . हो नाही करत शेवटी काय होईल ते होईल म्हणत मी जून मध्ये डिसेंबरच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला . पहिली अडचण होती ती म्हणजे लेखी पेपरची , तीनतीन तासांचे दोन पेपर एकाच दिवशी असणार आणि अलीकडे पेनाने लिखाण लिहितच नाही . एवढे सहा तास कसे लिहिणार बरं त्यासाठी आधी तेवढा अभ्यास करावा लागणार हे मोठे टास्क होते माझ्यासाठी .
      अभ्यासक्रम व्हास्ट होता बँक , संघटना , घर , मुलं , नातू असे अनेक स्तरावर मी बिझी होते , काय करावं समजत नव्हतं म्हटलं काय होईल ते होईल फॉर्म तरी भरलेला आहे परीक्षेच्या वेळेस काय करायचं ते पाहू असे म्हणत अभ्यासाला लागले .
पण फॉर्म भरल्यामुळे जबाबदारीची जाणीव झाली . माझी आणि माझ्याबरोबर क्लासची दोन्हीचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती मी जोमाने अभ्यास सुरु केला दोन महिन्यावर परीक्षा आली तसा अगदी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे पहाटे उठणे , रात्री बसणे , लेखी परीक्षेचा अभ्यास तसेच पेटी वाजवण्याची प्रॅक्टिस , वेळ मिळाला की हेडफोन कानात घालून काम करत ऐकणे , मुख्य म्हणजे जाणीवपूर्वक रोज एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी असे दोन तास लिखाण सुरु केले . एक महिन्यात दोनशे पानी दोन वह्या भरल्या त्यामुळे लिखाण आणि पाठांतर दोन्ही साध्य झाले , मी सर्वतोपारी प्रयत्न सुरु ठेवले . नोव्हेंबर मध्ये लेखी परीक्षा झाली , त्यादिवशी हात भरुन आले पण बरंचसं टेन्शन कमी झाले . आता फक्त प्रॅक्टिकलचा अभ्यास होता , मी त्या नादाला लागले मधून अधून दांड्या व्हायच्या पण मी जेव्हा क्लासला जाई तेव्हा तेव्हा सर आणि मॅडम दोघेही वेळ काढून मला टिप्स देत असत , वैयक्तिक लक्ष देत असत , प्रॅक्टिस करुन घेत . बऱ्याचदा सकाळी बँकेसाठी साडेनऊला घर सोडलेले क्लास करून यायला रात्री साडेआठ व्हायचे . घरातून यांचे नेहमीप्रमाणे सहकार्य होतेच मी काय करेल त्याला साथ देणे हा आमच्यातला अलिखित नियमच होता . शेवटच्या पंधरा दिवसात तर सर आणि मॅडमनी माझा कॉन्फिडन्स इतका वाढवला की मलाच वाटायला लागलं आपण परीक्षा चांगली देऊ शकतो .
    क्लास सुरु करुन 25 वर्षें झालेली होती त्यामुळे क्लासमध्ये सुद्धा आमुलाग्र बदल जाणवत होता . सर आणि मॅडम यांची गायनशैली पण परिपक्व जाणवत होती . दोघांचे स्वभाव पण साथीमुळे बदललेले जाणवले सर थोडेशे स्ट्रिक्ट झालेत तर मॅडम एकदम हसतमुख झाल्यात . त्यादोघांनी अभ्यासपूर्वक संप्रदायिक कीर्तन , भारुड , दिंड्या , वर्षभरतील प्रत्येक सण , समारंभ , विविध कार्यक्रम , शालेय कार्यक्रम , असे बार्शी शहरांत , आसपास अनेक कार्यक्रम केले त्यात विद्यार्थ्यांना पण संधी मिळत असे . पंचक्रोशीत त्यांना लोक ओळखतात .
    सरांनी "तबला " हे अत्यंत उपयुक्त , सोपे आणि सुटसुटीत असे पुस्तक लिहिले आहे आणि मंडळाने ते प्रकाशित केले आहे . अजूनही पुढच्या पुस्तकांची मागणी मंडळ करत आहे . परीक्षा कालावधीत "परीक्षक" म्हणून इतर केंद्रावर ते दोघेही जात असतात . दोघांच्यातही इतके गुण आहेत त्यांनी जर पुणे गाठलं असतं तर आज ते फार लांब पोहोचले असते . पण त्यांनी तसे न करता हाडाच्या कलाकारांप्रमाणे आपली कला जोपासली आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न ते करत राहिले . मुख्य म्हणजे बार्शीसारख्या छोट्या शहरात तबला , पेटी , गायन सर्व एकच ठिकाणी अशा क्लासची उपलब्धी करुन दिली . क्लासमध्ये तबला आणि गायन याचे विद्यार्थी जास्त प्रमाणात तयार झाले . अनेकजण विशारद होऊन गेले आहेत . त्या दोघांचेही मला खूप कौतुक वाटते अगदी शून्यातून सुरु करत एवढ्या उंचीवर क्लास गेला आहे . आता तर 1 फेब्रुवारीपासून त्यांनी सर्व प्रकारची वाद्ये आणि भरतनाट्यम यांचीही सुरुवात केली आहे . म्हणजे कोणत्याही कलेचे याठिकाणी मार्गदर्शन मिळू शकणार आहे . त्या दोघांचीही धडपड आणि  कौशल्य पाहता त्यांना भविष्यात काहीतरी मोठी संधी मिळायला हवी असे मला राहून राहून वाटते .
     14 डिसेंबर रविवार शेवटी माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला सकाळी आठ वाजता माझी परीक्षा होती . अगदी परीक्षार्थी प्रमाणे , शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न केले होते तेवढ्याच दृढ निश्चयाने परीक्षेला गेले . बाकी परीक्षा शनिवारी सुरु झाल्या होत्या त्यामुळे परीक्षक कसे आहेत हे शनिवारीच समजले होते . परीक्षक म्हणून आलेले श्री. अंगापूरकर सर आले होते , या सरांच्या अपेक्षा फारच होत्या . आत्तापर्यंत आलेल्या परीक्षकांपैकी अत्यंत चिकित्सक परीक्षक होते . त्यांना संगीत विषयात डुंबणारे विद्यार्थी हवे होते . तसे ते बोलत होते . माझी परीक्षा झाली परीक्षा तर चांगली झाली होती पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कितपत मी दिलं याचा मला अंदाज येत नव्हता त्यामुळे अगदी रिझल्ट येईपर्यंत काहीच शाश्वती नव्हती पण सर मॅडम दोघेही परीक्षा चांगली झाली म्हणत होते . पण एकाअर्थी चांगलं झालं असं वाटलं . आपण एवढा आटापिटा करत आहोत तर त्या निकशाला उतारायला पाहिजे असे वाटले . आणि व्हायचं ते झालं मी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले पण प्रॅक्टिकल मध्ये नाही झाले . थोडीशी खट्टू झाले तीन चार दिवस मूड गेला पुन्हा क्लासमध्ये गेले , गप्पा झाल्या त्या दोघांचेही म्हणणे असे आले की आत्ता एवढा अभ्यास झालाय तर तुम्ही तावातताव मे मध्ये परीक्षेला बसणार काय पहा . आता तुम्हाला पास क्लास चालणार असेल तर लेखी परीक्षा न देता फक्त प्रॅक्टिकल दिली तर चालणार होती . तसेही मला यात काही करिअर करायचे नाही पण एवढे केलं आहे तर त्यातील प्राविण्य मिळवलेल्या पदवीचा मानाचा तुरा खोवायला  मिळाला तर मला आनंद होणार होता , ती एक सुप्त इच्छा होती शेवटी त्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला , घरी सगळेच म्हणू लागले देऊन टाक परीक्षा ! मग पुन्हा फक्त प्रॅक्टिकल परीक्षेचा फॉर्म भरला पुन्हा प्रॅक्टीस सुरु केली यावेळी मला फक्त पेटी वाजवण्याची प्रॅक्टीस करायची होती परीक्षेची तारीख आली 10 मे याहीवेळी मी प्रामाणिक प्रयत्न केले . पहाटेच्यावेळी रियाज केला तासनतास क्लासमध्ये बसले आणि परीक्षेचा दिवस उजाडला . यावेळी परीक्षक म्हणून आष्टा जिल्हा सांगली येथील मनिषा जोशी मॅडम आल्या होत्या . मोठ्या परीक्षेची मी एकटीच होते त्यामुळे सुरुवातीला सकाळी 8 वाजता मंच घेऊ असे त्या म्हणाल्या . दरबारी कानडा आणि मुलतानी याचे बडे ख्याल वाजवले पुन्हा मालकंस वाजवला त्यात नवक्का तिहाई घेतली , मर्मबंधातली ठेव ही हे नाट्यगीत वाजवले आणि परीक्षक खूश झाल्या . उर्वरित परीक्षा इतर परीक्षा झाल्यावर घेऊ म्हणाल्या त्याप्रमाणे पुन्हा दुपारी 12 नंतर ती परीक्षा झाली पण चर्चेत त्यांनी मला बरचसं ताणल होतं त्यामुळे मी यावेळी रिझल्टची वाट पहायची नाही असे ठरवले होते .
आत्रेयचा वाढदिवस आहे चार दिवस पुण्याला जाऊन यावे म्हणून मी पुण्यात आले आणि आज दुपारी मॅडमचा फोन आला आणि रिझल्ट ऐकून समाधान वाटले , आनंद गगनात मावेनासा झाला . आता मला त्या certificate वर काहीही करायचे नाही पण एका ध्येयाने मी पछाडल्यासारखी झाली होते ते पूर्ण झालं ह्याचं मला प्रचंड समाधान आहे . हे यश माझे एकटीचे नसून सर , मॅडम , तबला साथीदार , क्लासमधील सर्व गायक असे क्लासचे सर्व सहकारी मुख्य म्हणजे माझे कुटुंब विशेषतः यांचे मनापासून आभार . आजपर्यंत क्लासमधून अनेकजण विशारद होऊन गेले होते त्यामानाने पेटी वाजवणारे कमी होते आणि मला हेही समजले की क्लासमधून पेटीचे विशारद अजून कोणी झालेले नव्हते . पाचव्या परीक्षेपर्यंत झालेले होते . माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे क्लासची पहिली हार्मोनियम विशारद होण्याचा मान मला मिळाला होता . आणि हो विशारद मध्ये मला 60% मार्क्स आहेत पण मी रिपिटर म्हणून फॉर्म भरल्यामुळे मला पास क्लास मिळाला आहे असो .
   मला भावगीत , भक्तीगीत , शास्त्रीय संगीत , नाट्यगीत ,  लावण्या , जुनी हिंदी मराठी गाणी हे ऐकण्याची प्रचंड आवड आहे . लहानपणापासून अगदी आजही सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे रेडिओ ! विविध भारती , आणि मराठी केंद्रे ! आजही सकाळी उठल्यापासून दहा वाजेपर्यंत घरात रेडिओ सुरु असतो त्याच्या जोडीला पूर्वी टेपरेकॉर्डर त्याच्या कॅसेट्स नंतर सी डी प्लेअर त्याच्या सी डी घरात खचाखच भरलेल्या असत . माणिक वर्मा , बकुळ पंडित , वसंतराव , सुमन कल्याणपूर , सुलोचना चव्हाण , मुकेश , सर्व मंगेशकर , श्रेया घोषाल आणि कितीतरी गायकाना वाफाळलेला दुधातील चहा घेत कुठेतरी एकांतात , निवांत गाणी ऐकत बसायला फार आवडते आत्ता खरा माझा संगीत क्षेत्रात प्रवेश झाला आहे , आता तर केव्हाही , कुठेही हवं ते कोणत्याही प्रकारचे आणि कोणत्याही गायकाचे गाणं ऐकणे मोबाइलमुळे सहज शक्य होते . त्यामुळे आता फक्त ऐकणे ,  आत्मसात करणे आणि एक मुख्य म्हणजे सहजपणे कोणत्याही गायका बरोबर पेटी वाजवणे , वेगवेगळ्या धून , सोलोवादन , सर्व प्रकारचे वादन हे माझे आगामी ध्येय आहे . त्यासाठी सातत्याने फक्त आणि फक्त सराव गरजेचा आहे .
पुनःश्च एकवेळ श्री. स्वामी समर्थ संगीत क्लास , सर , मॅडम , सर्व गायक तब्बलजी सहकाऱ्यांचे आणि माझ्या कुटुंबियांचे मनापासून धन्यवाद !!
🙏🙏


Tuesday, November 25, 2025

विशारद पुर्ण लेखी अभ्यास

खालील संकल्पना स्पष्ट करा

 

मार्गी संगीत

 भारताच्या  शास्त्रीय संगीताच्या प्राचीन परंपरेत दोन प्रकार आढळतात . मार्गी संगीत आणि देशी संगीत , यापैकी मार्गी संगीत हे अत्यंत प्राचीन शास्त्रीय व गंभीर स्वरूपाचे मानले जाते . 
 उत्पत्ती : मार्गी संगीताची उत्पत्ती वेदकाळापासून विशेषतः सामवेदात सुरू झाली आहे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात मार्गी संगीतातील स्वर , राग , ताल , गान पद्धती यांचे विस्तृत वर्णन आढळते मार्ग म्हणजे "नियत मार्ग" ठरलेली पद्धत किंवा शास्त्रीय नियम . यामुळे मार्गी संगीत हे निश्चित अशा शास्त्रीय नियमांवर आधारित असते.
 स्वरूप : मार्गी संगीताचे स्वरूप हे अध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचे आहे याचा मूळ उद्देश आत्मिक उन्नती देवपूजा , यज्ञ , नाट्य , नृत्य व शास्त्रीय अभिव्यक्तीसाठी उपयोग होतो गंभीर गांभीर्यपूर्ण ध्यानात्मक स्वरूप आहे .
 स्वर व राग : शुद्ध स्वरांचा म्हणजे ऋषभ गांधार निषाद  इत्यादी प्राचीन स्वरांचा वापर केला जाईल .
 मार्गी संगीतामध्ये रागाची बांधणी वेद पठणातील गान धोरणावर आधारित होती तर तालव्यवस्था निश्चित असे शास्त्रीय तालांचा वापर केला जाई आणि तालांचा वापर केवळ मनोरंजन म्हणून नसे तर नृत्य व नाट्यकृतीला शास्त्रीय बांधणी देणे हा याचा मुख्य उद्देश असे .
     मार्गी संगीत हे प्रामुख्याने विद्वान , ऋषी , ब्राह्मण , गंधर्व किंवा नाट्यमंचावर सादर करणारे कलाकार यांच्यासाठी होते ते सामान्य जनतेसाठी नव्हते.
    थोडक्यात मार्गी संगीत हे शास्त्रीय , धार्मिक , अध्यात्मिक उन्नतीसाठी असलेले संगीत आहे यामध्ये नियमबद्ध स्वर , ताल , राग याचा वापर होतो हे संगीत प्राचीन ऋषी व गंधर्वांच्या परंपरेतून आलेले असून नाट्यशास्त्र हा याचा प्रमुख आधार मानला जातो . 


देशी संगीत 

  देशी म्हणजे प्रांत किंवा प्रदेश, प्रादेशिक पातळीवर जे संगीत विकसित झाले आणि लोकजीवनांशी लोकभावनांशी जोडले गेले त्याला देशी संगीत असे म्हणतात मार्गी संगीतातील कठोर नियमांपेक्षा हे मोकळे , साधे आणि लोकसंगीताशी निगडित असते .

विशेषतः-  प्रामुख्याने यामध्ये प्रांतीय भाषेचा वापर केला जातो आणि लोकजीवनाशी जोडलेले असते साधे लयप्रधान सोप्या स्वररचनांचे गाणे असते हा प्रकार लोकांना सहज समजणारा गाता येणार असतो भजन , कीर्तन , ओवी , अभंग , लावणी ,  गोंधळ भारुड असे प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार यामध्ये आढळतात याचे विषय बहुधा धार्मिक सामाजिक आणि ऐहिक जीवनाशी निगडित असतात .
देशी संगीताचे प्रकार :-
 शारंगदेवांच्या संगीत रत्नाकर मध्ये देशी संगीताचे एकूण 34 प्रकार सांगितले आहेत त्यापैकी काही प्रमुख प्रकार म्हणजे ओवी , अभंग , भारुड , लावणी , गोंधळ , पावसाळी गीत , कोळी गीत , बाळाला झोप येण्यासाठी गायले जाणारे अंगाई गीत यांचा यात समावेश होतो .
 देशी संगीत आणि मार्गी संगीत यातील फरक 

  

Monday, October 27, 2025

आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन* *एक गोड आठवण*

 *आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन*
*एक गोड आठवण*



    ठरल्याप्रमाणे 25 आणि  26 ऑक्टोबर 2025 हे दोन दिवस सगळ्यांनी एकत्र जमून धमाल केली आणि जुन्या नव्या आठवणींना उजाळा देत , जागरण मस्ती करुन शरीराने थकलो असलो तरी मनाने तरुण होत , तृप्त होऊन एक प्रकारची एनर्जी घेऊन अगदी दोन वर्षाच्या आत्रेयपासून पंचाहत्तर वर्षांच्या भाऊजीपर्यंत प्रत्येकजण आपापल्या घरी गेले . 

     तसं तर आईकाका गेल्यापासून वर्षातून एक दिवस म्हणजे आईकाकांचा स्मृतीदीन 9 जुलै यादरम्यान आम्ही पंचकन्या एकत्र जमण्याचा निश्चय केलेला आहेच . पण 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 हे वर्ष आमच्या फॅमिलीसाठी जरासे वेगळे होते . यावर्षी तशी वेगवेगळी कारणे पण होती . आम्ही सर्वजण भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रभर विखुरलेले आहोत , मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या मागे प्रचंड व्याप आहेत , प्रत्येकजण खूप बिझी आहे , फक्त कार्याच्या निमित्ताने एकमेकांकडे जाणे होते . मग एवढे Events कसे काय करावे असा प्रश्न मनात घर करुन होता . त्याप्रमाणे मुलांशी संपर्क साधू आणि पाहू काही हटके करता येईल ते , एखादा पॉईंट ठरवावा प्रत्येकाने स्वतः तिथे यावे गेट टुगेदर आणि सेलिब्रेशन करावे आणि तिकडूनच आपापली घरे गाठावी असे केल्यास सर्वांना सोयीचे होईल मुलांना पण मजा येईल वीकेंड एन्जॉय केल्याचा आनंद होईल. कारण आजकालची पिढी वेळ द्यायला तयार नसते त्यांच्या आवडीचा विचार केला तरच त्यांनाही एकत्र जमण्याची गोडी लागू शकेल असे काहीतरी ठरवण्याचा विचार होता कारण जबरदस्ती करुन उपयोग नाही त्यांना आवडेल असे केले तरच उत्स्फूर्तपणे ती सामील होतील , तसे तर मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्यांची ध्येये वेगळी , परिस्थिती वेगळी , धकाधकीचे जीवन त्यात त्यांना आवडेल असे काही केले तरच ती वेळ देणार त्यामुळे तसे काहीतरी मुलांच्या वेळा पाहून ठरवू असे ठरवले. प्रत्येकाला सवड म्हणलं तर हे फक्त दिवाळीच्या आसपासच होऊ शकेल. कसे करता येईल ते पाहू असे मी मनाशी ठरवले . 

    पहिल्यांदा मी यज्ञेश बरोबर बोलले , त्याला त्याच्या आईचा पन्नासावा वाढदिवस तर मोठा करायचा आहे पण काय करावे हे समजेना अशी त्याची अवस्था  झाल्याचे मला जाणवले . तो मला म्हणाला " करायचा तर आहे पण मला काय करावे ते समजत नाही."

पुन्हा दाक्षूला बोलले तर तिचीही काहीतरी करण्यासाठीची धडपड आणि मनोरे रचण्याची उत्सुकता मला तशीच जाणवली.

    कारण 1 नोव्हेंबर म्हणजे ज्योतीचा वाढदिवस असतो. यावर्षी तिला पन्नास वर्षे पुर्ण झाली त्यामुळे तीचे चालू वर्ष

" सुवर्ण महोत्सवी वर्ष "

 म्हणून आम्हाला करायचे होते. 


 15 नोव्हेंबर पुरंदरेना साठ वर्षे पुर्ण झाली म्हणजे त्यांची 

" शष्ठ्याब्धीपुर्ती " 

झाली त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे याचवर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पुर्ण झाली . संजू म्हणजे काकांचा प्राण ! बाकी संपुर्ण फॅमिलीच्या पण केंद्रस्थानी ती असते . त्यांचं काहीतरी व्हायला पाहिजे हे डोक्यात होते .

   21 एप्रिलला मायडीची

 " शष्ठ्याब्धीपुर्ती "

झाली , तर आमच्या फॅमिलीतील सर्वात मोठे सदस्य म्हणजे एम बी के भाऊजीना 2 जूनला पंचाहत्तरावे वर्ष सुरु झाले म्हणजे त्यांचा

 " अमृत महोत्सव " 

आता काकांची तिसरी पिढी असलेल्या मंजुच्या लग्नाला 22 डिसेंबरला पंचवीस वर्षे पुर्ण झाली . म्हणजे त्यांचा 

" रौप्य महोत्सव !" 

अशी भली मोठी इवेंट्सची यादी होती.

     आम्ही सर्वजण पुणे , मुंबई , कोल्हापूर , किर्लोस्करवाडी आणि बार्शी अशा विविध ठिकाणी राहतो. आता कसा बसवायचा सगळ्यांचा मेळ हा मोठा प्रश्न होता. त्यावर गेट टुगेदर हाच मस्त उपाय आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होत होते. तसे मी एकेकाला पर्सनल msg टाकत राहिले.

मग एका रविवारी दाक्षूने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि त्याला तिने काकांचे नाव दिले

 "आर के'ज ग्रँड सेलिब्रेशन "

त्याला ह्या उत्सवमुर्ती सोडून बाकी सगळे add केले आणि त्यावर तिने msg टाकला त्याला उत्तर म्हणून मी एकूण पाच प्रोग्रॅम , आणि outing चा प्लॅन असा सविस्तर msg टाकला . आणि काय आश्चर्य सगळे एकदम एक्साईट झाले , महाचर्चेला उधाण आले . अनेक रिसॉर्टची नावे समोर आली , प्लॅन जमू लागले . माझ्या गृहिताप्रमाणे दुसरे दिवशी ग्रुप थंडगार , मग मीच एखादा msg टाकला की त्याला प्रतिसाद मिळे पण प्रत्येकजण आपापल्या व्यापात गर्क होता . पण दाक्षायणी आणि मी मात्र सतत संपर्कात होतो मध्ये मध्ये यज्ञेश असे . जसा वेळ मिळेल तशा चौकशा करत ती मला अपडेट्स देत होती .

     आता डेट ठरवायची होती त्यातही दोन गट पडले 25/26 ऑक्टोबर की 1/2 नोव्हेंबर दोन आठवडे कीस पाडून शेवटी 25/ 26 ऑक्टोबर फिक्स झाले मग रिसॉर्टची शोधाशोध सुरु झाली , बजेट बघत फायनली तेही पक्के केले आणि आता कार्यक्रम 100% होणार या भावनेने  माझा जीव भांड्यात पडला .

    मग पुन्हा उत्सवमुर्ती साठी गिफ्ट , डेकोरेशन , प्रत्यक्षात कार्यक्रम त्याचे सूत्र संचालन , सांस्कृतिक कार्यक्रम , एकूण येणारा खर्च त्यानुषंगाने contribution या चर्चा होत राहिल्या . कारण गेट टुगेटर 24 तासांमध्ये सगळे व्यवस्थित आणि सुटसुटीत बसवायचे होते . 

आणि दिवाळीपूर्वी एकूण कार्यक्रमाचे नियोजन पुर्ण झाले . सर्वांनी 25 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या , तोरणा राजगडच्या सान्निध्यात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पासली या गावातील ब्रम्हे यांच्या " निसर्गायन " रिसॉर्टवर भेटण्याचे ठरले आणि सर्वजण दिवाळी , खरेदी , फराळ भेटीगाठी यात गुंगले . 




दिवाळी संपली आणि पुन्हा ग्रुपवर msg चे फटाके उडू लागले . 25 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून आम्हा पाच बहिणींचा मुले , मुली , सुना , जावई , नातवंडे असा एकूण सत्तावीस जणांचा मोठा परिवार आपापल्या ठिकाणांहून निघाल्याचे msgs आले . आमची गाडी 1 च्या दरम्यान नसरापुर फाट्याला वळली आणि अर्ध्या तासामध्ये सगळेच मागे पुढे होते असे समजत होते . वेल्हेच्या पुढे मात्र आगदीच डोंगरातून घाट माथ्यावर गाडी चढू लागली . जियो सोडता सर्व मोबाईलची रेंज गेली पण रस्त्यातच सर्वांच्या भेटी झाल्या आणि पुढचा 14/15 किलोमीटरचा प्रवास गोंधळ , मजा मस्ती , फोटोग्राफी  करत आम्ही एकेक करत डेस्टिनेशनला पोहोचलो . तिकडे सगळीच चोख व्यवस्था होती . 
  आम्हाला आता मुख्य कार्यक्रमाचे वेध लागले होते कारण ज्यांचे कार्यक्रम होणार होते त्यांना अजिबातच कल्पना नव्हती . तिथे दोन बंगले होते , हुशारीने त्या सगळ्यांना एका बंगल्यात पाठवले . दुसऱ्या बंगल्यात आम्ही सर्वजण जय्यत तयारीनिशी होतोच , हॉलची सजावट सगळ्या मुलांनी दरवाजा लावून घेऊन करायला सुरुवात केली .  दिवाळीनिमित्त सर्वांनी ट्रेडिशनल कपडे घालायचे ठरलेले होते . सर्वजण थाटात सजून धजुन तयार होत होते . शेवटी तो क्षण आला , हॉलचे लाईट्स बंद केले होते त्या सात जणांना बाहेर खुर्च्यांवर बसवले आणि काही कळायच्या आत सर्वांनी जल्लोषात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत त्या सर्वांना हॉलमध्ये घेतले . 

    दाक्षू आणि धनुने माईकचा ताबा घेत मस्तपैकी कार्यक्रमाची सुरुवात केली . लगेच दाक्षूची 

" वडा वडा , चाय गरम " ची आरोळी आली आणि वातावरण एकदम फनी मूडमध्ये आलं . आत्रेय, इनिका आणि अवनी या बच्चे कंपनीकडून 

" आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन"

या फलकाचे अनावरण करत टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली . मी विस्तृत प्रस्तावना करत एकूण कार्यक्रमाचे नियोजन सांगितले .  सगळेचजण एकदम भरवून गेले होते . सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञता ओसंडून वहात होती .



      



             




 प्रथम विविध कलाकारांप्रमाणे उत्स्फूर्तपणे केलेला विविधगुण दर्शनाचा कार्यक्रम सुरु झाला यामध्ये आत्रेयच्या 

" चिव चिव चिमणे " 

गाण्याने बहार आणली .  इनिकाच्या  गणेशाराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . भरतनाट्यमच्या दोन गाण्यावर तिचा उत्कृष्ट परफॉर्मन्स झाला . एखाद्या सराईत नृत्यांगनेसारखे अवनीचे दोन परफॉर्मन्स झाले . धनु , मनू , ज्योती , मुकुंद , मंजू यांनी गीत गायन केले त्याचा सर्वांनी आनंद लुटला . 

आर केंचा एवढा मोठा परिवार एकत्र जमला आहे तर त्याला साजेसा 

" वऱ्हाड निघालं लंडनला "

या एकपात्री प्रयोगातील एक प्रसंग सादर करत कार्तिकने धमाल उडवून दिली .

 तर आकांक्षाने 

_.      " उन उन खिचडी साजूक तूप " 

या कवितेचे वाचन केले .

उत्स्फूर्तपणे अमोलने नटसम्राटमधील एक भन्नाट परफॉर्मन्स केला तर तायडीने पण तिच्या स्टाईलने तिच्या पोतडीतील नवरा बायकोच्या संबंधावर एक मजेदार किस्सा वाचून दाखवला .

    कार्यक्रमाची रंगत वाढत होती पण वेळ अपुरा वाटला इकडे जेवण तयार झाले होते . येणाऱ्या खमंग वासाने भूक चाळवत होती .

मग आम्ही या सर्वांच्या  सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली . यात हार , बुके , crown , हातात अंक दर्शक , गळ्यात पट्टी , दिव्यांची ताटे , केक , फुलांची , पणत्यांची रांगोळी , फुगे , लाईटच्या माळा अशी भरगच्च तयारी केली होती . त्यांच्यापैकी कोणालाच याची कल्पना नसताना असा सत्कार करुन घेताना त्यांना सर्वांनाच भरुन येत होते . अत्यंत उत्साहात जवळजवळ दोन अडीच तास कार्यक्रम झाला नंतर जेवणे झाली . पुन्हा गप्पांची मैफिल , पत्ते , गाणी , भेंड्या करत रात्री एक वाजता सर्वजण झोपी गेले आणि पुन्हा पहाटे साडेपाच वाजल्यापासून एकेकजण उठले . मोठाले दोन लॉन्स , डोंगरांनी मस्त धुक्याची चादर लपेटली होती. मधूनच लालबुंद आभाळ दिसत होते , बदलत्या रंगछटा न्याहाळत , उगवत्या सुर्याला नमस्कार करत निसर्गाच्या सान्निध्यातली ती पहाट फारच प्रसन्न वाटत होती . सकाळचा चहा , नाष्टा आणि गप्पांची मैफिल आणि रात्रीचे राहिलेले सेशन पुढे सुरु झाले . 

        नेमक्या या प्रसंगाला अनुसरून कीर्तीने तिचे मनोगत व्यक्त केले , तशी RK फॅमिली मध्ये नवीनच असणारी ती पण तिला या ग्रुपमध्ये नात्यापेक्षा मित्रत्वाचा जास्त भास होत असल्याचे , जाणवल्याचे तिने सांगितले आणि पु. ल. देशपांडे यांच्या मैत्री या कवितेचे तिने वाचन केले . मायडीने तिच्या छान शैलीत सर्व उत्सवमुर्तींच्या वतीने कार्यक्रमाचे कौतुक आणि आभार व्यक्त केले तर चीनून

 "  दोन दिवसांपासून सर्वांचे कलागुण दर्शन मी पाहत आहे या चालू धकाधकीच्या जीवनात कोणतीही कला जोपासणे महत्वाचे आहे आपले पुढील गेट टुगेदर होईल तेव्हा मी नक्कीच काहीतरी सादर करेन "  

अशी इच्छा व्यक्त केली .

त्याच दरम्यान ज्योतीने मिरजवरुन ऑर्डर केलेली हार्मोनियम आमच्याबरोबर आणली होती . हा संपूर्ण सोहळा अनुभवता माझ्या मनात एक नाट्यगीत रुंजी घालू लागले 

" मर्मबंधातली ठेव ही "

ते मी पेटीवर वाजवले ते ऐकून सर्वजण धुंद झाले . पुन्हा सर्वजण फ्रेश झाले आणि हिरवळीवर , डोंगराच्या पायथ्याला , झाडीत फोटोग्राफी सुरु झाली . 

    चेरी ऑन द टॉप म्हणजे हे दोन दिवसातले सगळे प्रसंग ओजसने त्याच्या कॅमेऱ्यात अतिशय कल्पकतेने कैद करुन ठेवले आहेत . त्याची लिंक त्याने सर्वांना शेअर केली आहे ती पाहताना पुन्हा आपण तिथे असल्याचा भास होतो . मग कायमच सर्वांना आनंद देणारा हा प्रसंग शब्दबद्ध करावासा वाटला . कार्तिकने त्याच्या गुरुवारच्या व्हिडिओसाठी छान शूटिंग आणि फोटोग्राफी केलेली आहे लवकरच तेही आपल्याला पहायला मिळेल !







पुन्हा जेवणे झाली दुपारचा एक वाजला आणि सर्वांना परतीचे वेध लागले पण प्रत्येकजण रेंगाळत होता . जोडीला रिसॉर्टवाले ब्रम्हे यांनी पण स्वच्छता , जेवण , नाष्टा , चहा हे अगदी छान पद्धतीने पुरविले होते . शेवगा सूप , पालक सूप , दडपे पोहे , गरम वडे , मिसळ पोहे , बाकर वडी , पिठलं भाकरी , कढी खिचडी , अनेक प्रकारच्या चटण्या , पोळी , भाज्या , दलिया खीर अशी थंडगार वातावरणात वाफाळत असलेली गरमागरम भरगच्च खादगी ! अहाहा !!!!

   विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला विशेष सहाय्य केले ते म्हणाले 

   " आमचे रिसॉर्ट झाल्यापासून लोक इथे अनेक सेलिब्रेशन करण्यासाठी येतात . पण अशा प्रकारचं , इतक्या लोकांनी एकत्र येऊन पाच पाच कार्यक्रमांचे सेलिब्रेशन पहिल्यांदाच होत आहे आणि त्याचा मला पण खूप आनंद झाला आहे " .

     छान आठवणींची सुगंधी कुपी घेऊन पुन्हा नक्कीच असे गेट टुगेदर करु असा निश्चय करुन आनंद , उत्साह , कृतज्ञता , आनंदाश्रु , हळवेपणा अशा सर्व भावनाची रसमिसळ घेऊन प्रत्येकजण परतीच्या प्रवासाला लागले . मुख्य म्हणजे आमच्याच कुटुंबातील काहीजण अडचणीमुळे येऊ शकले नाहीत ते आता लवकरच पुढचे गेट टुगेदर ठरवूया असे म्हणत आहेत . मीही नियोजनाची जबाबदारी आता दुसऱ्या दोघांकडे देणार आहे . पाहू आता पुढचा योग कधी येतो ते !!

Monday, August 25, 2025

ग्रंथकारांचे संगीतातील योगदान

  संगीत क्षेत्रातील प्रमुख ग्रंकारांचे योगदान


1 भारतमुनींचे नाट्यशास्त्र


भारतमुनी हे नाट्यशास्त्र या ग्रंथाचे रचनाकार आहेत. भारतीय संगीत, नृत्य व नाट्य यांना शास्त्रीय आधार देणारे पहिले ग्रंथकार म्हणून त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांचे योगदान खालीलप्रमाणे आहे :


१. नाट्यशास्त्रातील संगीतविषयक मांडणी


नाट्यशास्त्र हे प्राचीन भारतातील नाट्य, संगीत व नृत्य यांचे विश्वकोश आहे.


त्यामध्ये गान, वाद्य, नृत्य या तिन्ही कलांवर विस्तृत विवेचन दिले आहे.


त्यातूनच पुढे भारतीय शास्त्रीय संगीताची मूलभूत तत्त्वे आकारास आली.


२. स्वर व स्वरस्थान नियम


भारतमुनींनी सप्तस्वरांची (षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद) मांडणी केली.


स्वरांचे उच्चारस्थान व स्वरांचा उद्गम (पक्षी, प्राणी, निसर्गध्वनी यांपासून) याची माहिती त्यांनी दिली.


स्वरांचा मानवाच्या भावनांवर होणारा परिणाम त्यांनी स्पष्ट केला.


३. रागांची पायाभरणी


त्या काळी "जाति" ही संकल्पना प्रचलित होती.


भारतमुनींनी जातीगान विषद करून पुढे राग-रागिण्यांच्या संकल्पनेची पायाभरणी केली.


म्हणजेच, रागसंगीताचा पाया नाट्यशास्त्रात सापडतो.


४. ताल प्रणाली


संगीतामध्ये लय व ताल यांचे महत्त्व त्यांनी प्रतिपादित केले.


विविध गती – विलंबित, मध्य, द्रुत यांचा उल्लेख आढळतो.


तालांच्या साहाय्याने गान व नृत्य अधिक प्रभावी होते हे त्यांनी सांगितले.


५. वाद्यशास्त्र


वाद्ये तीन प्रकारची सांगितली –


तत (तंतुवाद्ये) – वीणा, किन्नरी, इ.


अवदन्य (तालवाद्ये) – मृदंग, पखवाज इ.


सुषिर (वायुवाद्ये) – बासरी, शृंगी, इ.


वाद्यांचा नाट्यगृहात, नृत्यात आणि गानात कसा वापर करावा याचा ऊहापोह केला.


६. रससिद्धांत व संगीत


भारतमुनींच्या रससिद्धांतानुसार संगीत ही रसोत्पत्तीची साधना आहे.


नाट्यशास्त्रातील संगीत हे केवळ करमणुकीसाठी नव्हे तर भाव जागरणासाठी आहे असे त्यांनी अधोरेखित केले.


७. समग्र दृष्टीकोन


संगीत, नृत्य, नाट्य यांचा एकात्म विचार प्रथमच त्यांनी केला.


आजच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या मूळ पायात नाट्यशास्त्र व भारतमुनींचे योगदान आहे.


✅ थोडक्यात, भारतमुनींनी नाट्यशास्त्राद्वारे भारतीय संगीताला शास्त्रीय चौकट, स्वर-ताल-वाद्य यांची शास्त्रीय मांडणी, आणि रसोत्पत्तीचा उद्देश दिला. त्यामुळे ते भारतीय संगीतशास्त्राचे आद्य प्रवर्तक मानले जातात

 


2) शारंगदेव 


शारंगदेव हे भारतीय संगीतशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचे विद्वान होते. ते १३व्या शतकात होते आणि त्यांनी रचलेले "संगीत रत्नाकर" हे ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानले जाते.


खालीलप्रमाणे त्यांचे मुख्य योगदान स्पष्ट करता येईल :


१. संगीत रत्नाकर ग्रंथ


शारंगदेव यांनी रचलेले संगीत रत्नाकर हे सात अध्याय असलेले प्राचीन व प्रामाणिक ग्रंथ आहे.


या ग्रंथात गान, वाद्य आणि नृत्य या तिन्ही कलांचा सविस्तर अभ्यास आढळतो.


मार्गी व देशी संगीताचा संगम या ग्रंथात दिसून येतो.


२. सप्त स्वर आणि स्वरशास्त्र


सप्तस्वरांची स्थाने, स्वरांचा उद्गम, स्वरांचे गुण, त्यांच्या संयोगाने होणारे परिणाम याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले.


रागांचे वर्गीकरण व रचनाविधान स्पष्ट केले.


३. राग वर्गीकरण


रागांना शुद्ध, छायालग आणि संकीर्ण असे तीन प्रकार सांगितले.


तसेच दशविध राग वर्गीकरणही पद्धत त्यांनी दिली.


"परमेल प्रवेशक" रागांचा उल्लेखही त्यांनी केला.


४. तालशास्त्र


विविध तालांचे प्रकार, मात्राभेद, लयीचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.


प्राचीन ताल व त्यांचे उपयोग याची मांडणी केली.


५. गानपद्धती


गंधर्वगान, कुतपवृंदगान अशा प्राचीन गानप्रकारांचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले.


विविध गायकी शैली, रचनापद्धती व गानाची अभिव्यक्ती यांचे नियम सांगितले.


६. वाद्यविषयक माहिती


तंतुवाद्य, वायु वाद्य, अवनद्ध वाद्य अशा वाद्यांचे प्रकार सांगून त्यांचा उपयोग व रचना समजावून सांगितली.


वाद्यांच्या निनादशास्त्रावर माहिती दिली.


७. नृत्य व अभिनय


नृत्याचे प्रकार, अंग, उपांग, नृत्यभंगिमा यांचे विवेचन केले.


अभिनयातील रस, भाव, लय व गती यांचा संबंध उलगडून दाखवला.


८. भारतीय संगीत इतिहासातील स्थान


शारंगदेव हे "मार्गी संगीत" व "देशी संगीत" यांच्या संगमाचे दुवा ठरतात.


त्यांच्या ग्रंथामुळे पुढे हिंदुस्तानी व कर्नाटकी संगीत यांची स्वतंत्र परंपरा निर्माण होण्यास शास्त्रीय पाया मिळाला.


त्यामुळे त्यांना “भारतीय संगीतशास्त्राचे आधारस्तंभ” म्हटले जाते.


👉 थोडक्यात, शारंगदेवांचे "संगीत रत्नाकर" हे भारतीय संगीतशास्त्रातील विश्वकोश असून त्यातूनच पुढील संगीत परंपरांचा पाया घातला गेला.



3) मतंग


भारतीय संगीताच्या इतिहासात मतंग ऋषी हे अतिशय महत्त्वाचे शास्त्रकार होते. त्यांनी रचलेला "बृहत्देशी" हा ग्रंथ (इ.स. ८वे शतक) संगीतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व प्राचीन मानला जातो.


१. बृहत्देशी ग्रंथ


"बृहत्देशी" हा ग्रंथ हा देशी संगीतावर आधारित आहे.


"देशी" व "मार्गी" संगीताचा भेद प्रथमच मतंग ऋषींनी स्पष्ट केला.


या ग्रंथामुळे संगीतशास्त्राला नवा पाया मिळाला.


२. देशी संगीताची व्याख्या


मतंग ऋषींनी सांगितले :

“लोकप्रिय, लोकांना प्रिय वाटणारे, गाण्यास सोपे व रुचकर असे संगीत म्हणजे देशी संगीत.”


यामुळे संगीत शास्त्रीय चौकटीबरोबरच लोकाभिमुख झाले.


३. राग संकल्पना


प्रथमच "राग" हा शब्द व त्याची परिभाषा मतंग ऋषींनी दिली.


त्यांनी म्हटले :

“रंजयति इति रागः” म्हणजे मनाला रंजन करणारा स्वरसमूह म्हणजे राग.


या परिभाषेमुळे रागसंगीताची शास्त्रीय परंपरा पुढे निर्माण झाली.


४. स्वरशास्त्र व ताल


स्वरांचे प्रकार, त्यांच्या जागा, संयोग, तसेच स्वरांचा भावनिक परिणाम त्यांनी सांगितला.


तालाच्या रचनांविषयीही मार्गदर्शन केले.


५. संगीताचा विकास


मतंगांनी "मार्गी" (शास्त्रीय, नाट्यसंगीत) आणि "देशी" (लोकप्रिय, प्रादेशिक) संगीताचा फरक करून पुढील शास्त्रकारांना दिशा दिली.


त्यांच्या मते देशी संगीत हे मार्गी संगीताचे सोपे व लोकप्रिय रूप आहे.


६. भारतीय संगीत इतिहासातील स्थान


मतंग ऋषी यांना "रागसंगीताचे जनक" मानले जाते.


त्यांचा बृहत्देशी ग्रंथ पुढे आलेल्या शारंगदेवांच्या संगीत रत्नाकर सारख्या ग्रंथांना आधार ठरला.


मार्गी व देशी या दोन परंपरांचा सेतू मतंग ऋषी यांनी घातला.


👉 थोडक्यात, मतंग ऋषींनी संगीताला रागसंगीताची परिभाषा देऊन आणि देशी संगीताची व्याख्या करून भारतीय संगीतशास्त्राला नवा अध्याय सुरू करून दिला.


4 )रामामात्य 


रामामात्य हे १६व्या शतकातील प्रसिद्ध कर्नाटकी संगीतशास्त्ज्ञ होते. ते विजयनगर साम्राज्याच्या तिरुमल राय (अलीया रामराय) यांचे दरबारी विद्वान होते. त्यांनी रचलेला "स्वरामेलकलानिधी" हा ग्रंथ भारतीय संगीताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


१. स्वरामेलकलानिधी ग्रंथ


इ.स. १५० च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला.


या ग्रंथात मेलन पद्धती (Melakarta system) चे बीज प्रथमच आढळते.


पुढे वेण्कटमखी (१७वे शतक) यांनी याच पद्धतीचा विकास करून ७२ मेलकर्ते प्रस्थापित केले.


२. स्वर व श्रुती यांचे विवेचन


रामामात्य यांनी २२ श्रुती आणि स्वरांचा संबंध स्पष्ट केला.


विविध स्वरांची स्थाने व त्यांचे आंतरसंबंध दाखवून दिले.


स्वरांना स्थिरता व वैज्ञानिक आधार दिला.


३. वाद्यविषयक योगदान


त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय वाद्य वीणा होती.


रामामात्य यांनी वीणेची श्रुतीसिद्ध व्यवस्था घडवली.


वीणेच्या तारांवर स्वरसिद्धता व स्वरसंयोजनाची मांडणी करून संगीताची साधना सोपी केली.


४. ताल व राग

तालांचे प्रकार, त्यांची लयबद्धता व गणनापद्धती याचे सविस्तर विवेचन केले.


रागांची रचना व त्यांचा विकास पद्धतशीर रीतीने स्पष्ट केला.


५. भारतीय संगीतशास्त्रातील स्थान


रामामात्य हे मार्गी व देशी संगीत परंपरेनंतर कर्नाटकी संगीताच्या शास्त्रबद्ध मांडणीसाठी महत्त्वाचे शास्त्रकार ठरले.


त्यांचा स्वरामेलकलानिधी हा ग्रंथ पुढे मेलकर्त प्रणाली चा पाया ठरला.


त्यामुळे त्यांना मेलकर्त पद्धतीचे प्रवर्तक म्हटले जाते.


👉 थोडक्यात, रामामात्य यांनी राग व स्वरशास्त्राला वैज्ञानिक चौकट देऊन, मेलकर्ता पद्धतीचा पाया रचून आणि वीणेच्या माध्यमातून स्वरसंयोजन निश्चित करून भारतीय संगीतशास्त्राला महत्त्वपूर्ण दिशा दिली. 


5 ) अहोबाल 


अहोबाल हे १७व्या शतकातील महान संगीतशास्त्रज्ञ व ग्रंथकार होते. त्यांचा प्रमुख ग्रंथ म्हणजे “संगीत पारिजात”. हा ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीत परंपरेच्या फाटाफुटीनंतर लिहिला गेला आणि दोन्ही परंपरांचा संदर्भ यात सापडतो.


१. संगीत पारिजात ग्रंथ


अहोबाल यांनी रचलेला संगीत पारिजात हा ग्रंथ सशास्त्राचा सर्वसमावेशक ग्रंथ मानला जातो.


या ग्रंथात स्वर, राग, ताल, गानपद्धती, वाद्यविज्ञान यांचा सखोल अभ्यास केलेला आहे.


शारंगदेवांच्या संगीत रत्नाकर नंतर संगीतशास्त्राला दिशा देणारा हा महत्त्वाचा ग्रंथ ठरतो.


२. रागविज्ञान


रागांचे शास्त्रीय विवेचन त्यांनी दिले.


रागांच्या आरोह-अवरोह, वादी-संवादी, चल-स्थिर स्वर यांचा विचार त्यांनी सविस्तर मांडला.


रागांतील शुद्ध, विकृत व मिश्र स्वरसंगती याबाबत माहिती दिली.


३. तालशास्त्र


तालांची विविधता, मात्राविभाग, लय व गती यांचे स्पष्ट विवेचन केले.


तालांच्या वर्गीकरणाची मांडणी केली.


४. गानपद्धती


द्रुपद, आलाप, गानशैली या प्रकारांचे वर्णन केले.


गायकाने कोणत्या प्रकारे रागदर्शन करावे, त्यासाठी योग्य नियम कोणते असावेत हे सांगितले.


५. स्वर व वाद्य


सप्तस्वरांची स्थाने, त्यांचे गुणदोष व परिणाम स्पष्ट केले.


वीणा व इतर वाद्यांच्या स्वरसंयोजनाचे वर्णन केले.


६. भारतीय संगीत इतिहासातील स्थान


अहोबाल यांचा संगीत पारिजात हा ग्रंथ उत्तर हिंदुस्तानी संगीत परंपरेला पाया देणारा ठरला.


त्यांच्या ग्रंथातील अनेक संकल्पना आजच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अंगभूत आहेत.


म्हणूनच त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या घडणीत महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रकार मानले जाते.


👉 थोडक्यात, अहोबाल यांनी “संगीत पारिजात” या ग्रंथाद्वारे स्वर, राग, ताल, गानपद्धती आणि वाद्यविज्ञान यांचा सखोल अभ्यास करून हिंदुस्तानी संगीताच्या शास्त्रबद्ध घडणीत मोठे योगदान दिले.



6) आचार्य 


भारतीय संगीतशास्त्रात आचार्य बृहस्पती हे एक प्राचीन व आदरणीय आचार्य मानले जातात. त्यांचे विचार आज उपलब्ध ग्रंथांच्या स्वरूपात फारसे संपूर्ण मिळत नाहीत, परंतु इतर अनेक संगीतशास्त्रकारांच्या ग्रंथांमध्ये (उदा. संगीत रत्नाकर) त्यांचे उल्लेख आढळतात. त्यामुळे बृहस्पती हे भारतीय संगीत परंपरेतील आद्य आचार्यांपैकी एक मानले जातात.


१. स्वरशास्त्र


आचार्य बृहस्पती यांनी सप्तस्वरांचे स्वरस्थान व त्यांचे गुणधर्म यांचे विवेचन केले.


स्वरांचा भावनिक परिणाम (रसोत्पत्तीशी संबंध) त्यांनी अधोरेखित केला.


२. तालविज्ञान


लय, ताल, मात्राभाग यांचे नियम त्यांनी सांगितले.


ताल हा गान, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा प्राण आहे हे प्रतिपादन त्यांच्याकडे आढळते.


३. रागविचार


प्रारंभीच्या काळात “राग” या संकल्पनेला शास्त्रीय चौकट देण्याचे काम बृहस्पतींनी केले, असे अनेक विद्वान मानतात.


स्वरसंयोजनातून रंजक भाव उत्पन्न होतो, यावर त्यांनी विशेष भर दिला.


४. गानशैली


मार्गी व देशी गानपरंपरेच्या घडणीत बृहस्पतींचे योगदान मानले जाते.


नाट्यसंगीत, सामगान व गंधर्वगान यांच्या पायाभूत संकल्पना त्यांनी दिल्या.


५. भारतीय संगीत इतिहासातील स्थान


आचार्य बृहस्पती हे नाट्यशास्त्रकार भरतमुनींपूर्वी किंवा समकालीन काळातील संगीतविचारक मानले जातात.


त्यांच्या विचारांचा प्रभाव नंतरच्या संगीतशास्त्रकारांवर (भरतमुनी, मतंग, शारंगदेव इत्यादींवर) दिसतो.


म्हणूनच त्यांना “संगीतशास्त्राचे आद्य प्रवर्तक आचार्य” मानले जाते.


👉 थोडक्यात, आचार्य बृहस्पती यांनी स्वर, राग, ताल व गानशैली यांची तत्त्वे सांगून भारतीय संगीतशास्त्राची पायाभरणी केली


7 )ठाकूर जयदेव सिंग 


ठाकूर जयदेव सिंह यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्वाचे आहे. ते प्रामुख्याने संगीतशास्त्रज्ञ, संस्कृत-हिंदी भाषांतरकार, आणि भारतीय संगीताचे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे योगदान पुढीलप्रमाणे –


ठाकूर जयदेव सिंह यांचे योगदान :


संगीत शास्त्र ग्रंथांचे भाषांतर


त्यांनी प्राचीन संस्कृत संगीतशास्त्र ग्रंथांचे हिंदी भाषांतर करून संगीत क्षेत्राला मोठी देणगी दिली.


विशेषतः पंडित शारंगदेव लिखित “संगीत रत्नाकर” याचा त्यांनी संस्कृतवरून हिंदीमध्ये अनुवाद केला. हा अनुवाद अत्यंत प्रामाणिक, सविस्तर आणि समजण्यास सोपा आहे.


तसेच इतरही प्राचीन ग्रंथांचे भाषांतर व संपादन केले.


संगीत साहित्यातील संशोधनकार्य


त्यांनी भारतीय संगीतशास्त्रातील परंपरा, रागविचार, लय, ताल व गायनशैली यांवर सखोल अभ्यास करून संगीतविद्यार्थ्यांना व अभ्यासकांना दिशादर्शन केले.


संगीत रत्नाकरावरील टीका व विवेचन


त्यांच्या भाषांतरासोबतच दिलेल्या स्पष्टीकरणे व टीका विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.


त्यामुळे शारंगदेवाच्या रचनेतील गूढ व तांत्रिक संकल्पना सर्वसामान्य वाचक आणि अभ्यासकांना समजण्यास सुलभ झाल्या.


संगीत प्रसारक म्हणून योगदान


ते आकाशवाणीशीही संबंधित होते. आकाशवाणीवरून त्यांनी भारतीय संगीताचा प्रचार व प्रसार केला.


शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत व ध्रुपद-ख्याल इत्यादी गायन प्रकार जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान लक्षणीय आहे.


विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साहित्य


त्यांच्या लेखनामुळे भारतीय संगीतशास्त्राचे अध्ययन शैक्षणिक स्तरावर सोपे झाले.


विद्यापीठांमधील संगीत अभ्यासक्रमांत त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतला जातो.


👉 संक्षेपाने सांगायचे तर, ठाकूर जयदेव सिंह यांनी प्राचीन संस्कृत संगीतशास्त्र आधुनिक भाषेत उपलब्ध करून दिले. त्यामुळे संगीत क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी आणि रसिक यांना भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा समजून घेणे सोपे झाले.


Sunday, August 24, 2025

विशारद लेखी अभ्यास





*हिंदुस्तानी संगीतातील दहा थाट*


*थाट बिलावल*

शुद्ध स्वर

*थाट कल्याण*

म तीव्र

*थाट खमाज*

नी कोमल

*थाट काफी*

ग , नी कोमल

*थाट आसावरी*

ग, ध , नी कोमल

*थाट भैरवी*

रे , ग , ध , नी कोमल

*थाट भैरव*

रे , ध कोमल

*थाट मारवा*

 रे कोमल म तीव्र

*थाट पूर्वी*

रे , ध कोमल म तीव्र

*थाट तोडी*

रे , ग ,ध कोमल म तीव्र


*विविध थाटांमध्ये रागांचे वर्गीकरण* 


*थाट बिलावल*

दुर्गा , अल्हैया बिलावल , बिहाग , देसकर , शंकरा.

*थाट कल्याण*

भूप , यमन , केदार , हमीर , गौडसारंग , कमोद , छायानट , मारु बिहाग , हिंडोल , कल्याण 

*थाट खमाज*

देस , खमाज , तीलक कमोद , तिलंग , जयजयवंती .

*थाट काफी*

काफी , सारंग , भीमपलास , बागेश्री , पिलू , पटदिप , बहार , मीयॉं मल्हार .

*थाट आसावरी*

जौनपुरी , आसावरी , दरबारी कानडा .

*थाट भैरवी*

भैरवी , मालकंस .

*थाट भैरव*

भैरव , कलिंगडा , बिभास .

*थाट मारवा*

पुरीया , ललत , सोहनी , मारवा 

*थाट पूर्वी*

पुरीया धनश्री , बसंत

*थाट तोडी*

मुलतानी , तोडी


खालील विषयांवर विस्तृत माहिती द्या

 1 मार्गीसंगीत 

2 देशीसंगीत 

3 स्वस्थान नियम 

4 गंधर्वगान 

5 कुतप वृंदगान



१. मार्गी संगीत

  • अर्थ : “मार्ग” म्हणजे नियमबद्ध मार्ग, परंपरागत चौकट. मार्गी संगीत हे शास्त्रीय संगीताचे प्राचीन स्वरूप मानले जाते.

  • वैशिष्ट्ये :

    • नाट्यशास्त्रात (भरतमुनी) वर्णन केलेले.

    • देवपूजा, धार्मिक विधी, यज्ञ, देवालये यामध्ये वापरले जाणारे.

    • स्वर, लय, ताल यांचे अत्यंत शास्त्रीय आणि शुद्ध प्रयोग.

    • हे संगीत मोक्षप्राप्तीसाठी साधन मानले गेले.

  • उदाहरणे : सामगान, वेदपठणाच्या स्वरभेदात वापरलेले संगीत.


२. देशी संगीत

  • अर्थ : “देश” म्हणजे प्रांत किंवा लोकजीवन. देशी संगीत हे जनसामान्यांत विकसित झालेले संगीत आहे.

  • वैशिष्ट्ये :

    • लोककला, लोकगीत, नृत्य, मनोरंजनाशी जोडलेले.

    • साधे, सुगम आणि लोकांना भावणारे.

    • राग-रागिणींचा विकास देशी संगीतामुळे झाला.

    • हे संगीत मनोरंजनासाठी व लोककल्याणासाठी वापरले गेले.

  • उदाहरणे : लोकगीते, पारंपरिक गवळण, लावणी, भारूड.


३. स्वस्थान नियम

  • अर्थ : “स्वरांचे स्थान” म्हणजे स्वरांचे योग्य ठिकाणी उच्चारण व ध्वनीनिर्मिती यासंबंधी नियम.

  • महत्व :

    • प्रत्येक स्वराची (सा, रे, ग, म, प, ध, नि) निर्मिती मानवी शरीरातील विशिष्ट जागेतून होते.

    • या जागांना “स्थान” म्हटले जाते.

  • उदाहरणे :

    • सा – नाभीस्थान

    • रे – हृदयस्थान

    • ग – कंठस्थान

    • म – तालुस्थान

    • प – मूर्धास्थान

    • ध – नासिकास्थान

    • नि – शिरोस्थान

  • या नियमानुसार साधना केल्यास स्वर शुद्ध व प्रभावी होतात.


४. गंधर्वगान

  • अर्थ : “गंधर्व” हा प्राचीन काळातील संगीतशास्त्राचा संज्ञा आहे. भरतमुनींनी सांगितलेले संगीतशास्त्र म्हणजे गंधर्वशास्त्र.

  • वैशिष्ट्ये :

    • अत्यंत शास्त्रीय, व्यवस्थित नियमांनी बांधलेले संगीत.

    • स्वर, राग, ताल, लय यांचा सखोल अभ्यास.

    • गंधर्वगानाला सर्वोच्च व शास्त्रप्रधान स्थान होते.

  • उपयोग :

    • देवालये, राजदरबार, यज्ञ-याग इत्यादी ठिकाणी.

    • आजच्या हिंदुस्तानी व कर्नाटकी शास्त्रीय संगीताची मुळे गंधर्वगानात आहेत.


५. कुतप वृंदगान (कृतप/कुटप वृंदगान)

  • अर्थ : “कुतप” किंवा “कृतप” हा शब्द वाद्यांच्या गटासाठी वापरला गेला आहे.

  • वैशिष्ट्ये :

    • अनेक गायक व वादक मिळून केलेला समूहगान प्रकार.

    • देवपूजा, राजदरबारातील समारंभ, उत्सव यामध्ये सादर होई.

    • यात तालवाद्य, तारवाद्य, वातवाद्य यांचा समावेश असे.

  • उदाहरणे :

    • भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात “कुतप” म्हणजे रंगमंचावर वादन करणारा वृंद.

    • नाट्यप्रयोगातील संगीतसहाय्य कुतप वृंदगानातून होत असे.


थोडक्यात सारांश :

  • मार्गी संगीत – शास्त्रीय व धार्मिक.

  • देशी संगीत – लोकजीवनाशी संबंधित.

  • स्वस्थान नियम – स्वरनिर्मितीचे शास्त्र.

  • गंधर्वगान – प्राचीन शास्त्रीय संगीतपरंपरा.

  • कुतप वृंदगान – गायक-वादकांचा समूहसंगीत प्रकार.


 तुलनात्मक तक्ता 

मार्गी संगीत (Mārgi Sangeet)

भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्राचीन परंपरेत दोन प्रकार आढळतात – मार्गी संगीत आणि देशी संगीत. यापैकी मार्गी संगीत हे अत्यंत प्राचीन, शास्त्रीय व गंभीर स्वरूपाचे मानले जाते.

मार्गी संगीताची वैशिष्ट्ये

उत्पत्ती

मार्गी संगीताची परंपरा वेदकाळापासून (विशेषतः सामवेद) सुरू झाली आहे.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात मार्गी संगीतातील स्वर, राग, ताल, गानपद्धती यांचे विस्तृत वर्णन सापडते.

‘मार्ग’ शब्दाचा अर्थ

मार्ग म्हणजे "नियत मार्ग", ठरलेली पद्धत किंवा शास्त्रीय नियम.

त्यामुळे मार्गी संगीत हे निश्चित शास्त्रीय नियमांवर आधारित असते.

स्वरूप

हे संगीत आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचे आहे.

मूळ उद्देश: आत्मिक उन्नती, देवपूजा, यज्ञ, नाट्य, नृत्य व शास्त्रीय अभिव्यक्तीसाठी उपयोग.

गभीर, गांभीर्यपूर्ण व ध्यानात्मक.

स्वर व राग

शुद्ध स्वरांचा (ऋषी, गांधार, निषाद इत्यादी प्राचीन स्वर) वापर केला जात असे.

रागांची बांधणी वेदपठणातील गानधोरणावर आधारित होती.

तालव्यवस्था

निश्चित व शास्त्रीय तालांचा वापर.

तालांचा उद्देश केवळ मनोरंजन नसून नृत्य व नाट्यकृतीला शास्त्रीय बांधणी देणे.

साधक व श्रोते

हे संगीत प्रामुख्याने विद्वान, ऋषी, ब्राह्मण, गंधर्व किंवा नाट्यमंचावर सादर करणारे कलाकार यांच्यासाठी होते.

सामान्य जनतेसाठी नव्हते.

उद्देश

आत्मशुद्धी, मोक्षप्राप्ती, देवपूजा व शास्त्रीय साधना.

केवळ मनोरंजन हा याचा उद्देश नव्हता.

थोडक्यात

👉 मार्गी संगीत हे शास्त्रीय, धार्मिक व आत्मिक उन्नतीसाठी असलेले संगीत आहे. यामध्ये नियमबद्ध स्वर, ताल, राग यांचा वापर होतो. हे संगीत प्राचीन ऋषी व गंधर्वांच्या परंपरेतून आलेले असून नाट्यशास्त्र त्याचा प्रमुख आधार मानले जाते.

मार्गी संगीत आणि देशी संगीत यांतील फरक तक्त्याच्या स्वरूपात दिला आहे –

बाब / वैशिष्ट्य मार्गी संगीत देशी संगीत

अर्थ : “मार्ग” = निश्चित मार्ग, शास्त्रीय नियमांवर आधारित संगीत

“देश” = लोकजीवनाशी निगडित, प्रादेशिक व व्यवहारातील संगीत

उत्पत्ती वेदकालीन परंपरा (सामवेद, नाट्यशास्त्र) लोकपरंपरा, प्रादेशिक संस्कृती, लोकगीतांतून विकसित

स्वरूप धार्मिक, आध्यात्मिक, शास्त्रीय लौकिक, जनसामान्यांच्या भावभावनांशी निगडित

उद्देश आत्मिक उन्नती, देवपूजा, नाट्यकला, मोक्षप्राप्ती मनोरंजन, सामाजिक कार्यक्रम, लोकजीवनाचे प्रतिबिंब

श्रोते विद्वान, ऋषी, गंधर्व, नाट्यमंच सामान्य जनता

संगीताची रचना शुद्ध स्वर, गांभीर्यपूर्ण राग-ताल, नियमबद्ध बांधणी साधे स्वर, सोपे ताल, गेय व सहज गाण्याजोगे

भावना ध्यानात्मक, गंभीर, शास्त्रीय छटा लोकाभिमुख, हलकेफुलके, लोकप्रिय

उदाहरणे सामगान, गंधर्वगान, नाट्यशास्त्रातील संगीत लोकगीते, लावणी, भजने, प्रादेशिक गाणी

👉 थोडक्यात:

मार्गी संगीत = शास्त्रीय, धार्मिक, आत्मिक साधनेसाठी.

देशी संगीत = जनसामान्यांच्या जीवनाशी व भावनांशी जोडलेले.


 गंधर्वगान व कुतप वृंदगान याबद्दल सविस्तर माहिती आणि तुलना पाहूया

 
१) गंधर्वगान

अर्थ

गंधर्व = प्राचीन काळातील दैवी गायक.

गंधर्वगान म्हणजे दैवी, शास्त्रीय व नाट्यपरंपरेशी संबंधित गानप्रकार.

स्रोत

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात गंधर्वगानाचे विस्तृत वर्णन आहे.

हे मुख्यतः मार्गी संगीताच्या परंपरेत मोडते.

वैशिष्ट्ये

राग-ताल नियमबद्ध, गंभीर व शास्त्रीय पद्धती.

नाट्य, नृत्य व धार्मिक विधी यासाठी उपयुक्त.

आत्मिक उन्नती व शास्त्रीय अभ्यास यासाठी गंधर्वगान महत्त्वाचे.

उद्देश

देवपूजा, आत्मशुद्धी, नाट्यप्रस्तुती व शास्त्रीय साधना.

२) कुतप वृंदगान

अर्थ

कुतप हा एक विशेष वाद्यवृंद / संगीतवृंद (orchestra) होता.

वृंदगान म्हणजे वृंदाने (गटाने) केलेले गान.

त्यामुळे कुतप वृंदगान = वाद्यवृंदासोबत सादर केलेले सामूहिक गान.

स्रोत

नाट्यशास्त्र व प्राचीन नाट्यपरंपरेत उल्लेख.

नाट्यप्रयोगांमध्ये गायन-वादन एकत्रित करण्यासाठी ही पद्धत होती.

वैशिष्ट्ये

गायक, वादक, नर्तक यांचा समन्वय.

वाद्यांच्या साथीत समूहगान.

स्वर, ताल व लय यांची सांगड.

नाट्यशास्त्रीय नाट्यप्रयोगात पार्श्वसंगीताची भूमिका.

उद्देश

नाट्यरंजन, प्रेक्षकांचे मनोरंजन, कलात्मक आकर्षण वाढवणे.

सामूहिक वातावरण निर्माण करणे.

तक्त्याच्या स्वरूपात तुलना

बाब / वैशिष्ट्य गंधर्वगान कुतप वृंदगान

अर्थ दैवी, शास्त्रीय, नाट्यसंगीताशी संबंधित गान वाद्यवृंदासोबत केलेले सामूहिक गान

परंपरा मार्गी संगीताची परंपरा नाट्यशास्त्रातील गटगान व वाद्यवृंद परंपरा

स्रोत भरतमुनींचे नाट्यशास्त्र नाट्यशास्त्रातील संगीतविभाग

स्वरूप गंभीर, धार्मिक, शास्त्रीय गटगान, वाद्यांच्या साथीत

उद्देश देवपूजा, साधना, आत्मशुद्धी नाट्यरंजन, समूहगान, मनोरंजन

विशेषता राग-ताल नियमबद्ध, आध्यात्मिक छटा वाद्य + गायक यांचा समन्वय, नाट्यसंगीत

👉 थोडक्यात :

गंधर्वगान = दैवी व शास्त्रीय गानपरंपरा.

कुतप वृंदगान = वाद्यवृंदासोबतचे सामूहिक नाट्यसंगीत.

कुतप वृंदागान (किंवा कृतप/कुतुप वृंदगान) हा एक प्राचीन भारतीय संगीतप्रकार आहे. हे प्रामुख्याने भरतमुनींच्या "नाट्यशास्त्रात" आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेखिलेले आहे. चला याचा सविस्तर आढावा घेऊया –

🔹 अर्थ व संकल्पना

कुतप हा एक वाद्यवृंद मानला जातो.

"वृंदगान" म्हणजे गायक व वादक यांच्या समूहाने एकत्रित गायलेले किंवा वाजविलेले संगीत.

त्यामुळे कुतप वृंदगान म्हणजे ठराविक वाद्ये (कुतप) व गायक यांच्या सहभागातून सादर होणारा सामूहिक गानप्रकार.

🔹 वापर

प्राचीन नाट्य, विशेषतः संस्कृत नाट्यप्रयोगांमध्ये (नाटकमध्ये) याचा उपयोग होत असे.

रंगमंचावरील प्रवेश, युद्धदृश्ये, मंगल प्रसंग, देवतांची आवाहने यावेळी कुतप वृंदगान गायल जात असे.

हा एक प्रकारचा संगीतमय पार्श्वभूमी मानला जातो.

🔹 वाद्ये

"कुतप" मध्ये मृदंग, वीणा, किंनरी, भेरी, शंख इत्यादी वाद्यांचा समावेश असे.

या वाद्यांबरोबर गायक मंडळी मिळून सामूहिक गान करत.

🔹 वैशिष्ट्ये

समूहगान स्वरूप – एकट्याने गायलेले नव्हे, तर गायकांचा एक गट मिळून गायन करतो.

तालप्रधानता – विशेष प्रसंगानुसार तालबद्ध वाद्यवृंद व स्वरांचा संगम.

नाट्याला पूरकता – गान हे नाटकातील भावदर्शनासाठी वापरले जात असे, म्हणजेच स्वतंत्र संगीत मैफलीसारखे नव्हे.

👉 एकूणच, कुतप वृंदगान हे प्राचीन भारतीय नाट्यसंगीतातील एक सामूहिक वाद्य-गायनप्रकार आहे, ज्याचा उद्देश नाट्याच्या आशयाला व भावनांना उभारी देणे हा होता .

कर्नाटक संगीत आणि उत्तर भारतीय संगीत विस्तृत विवेचन द्या

कर्नाटक संगीत (दक्षिण भारतीय संगीत) आणि उत्तर भारतीय संगीत (हिंदुस्तानी संगीत) हे भारतीय शास्त्रीय संगीताचे दोन प्रमुख प्रवाह आहेत. दोन्हींचा उगम वैदिक संगीतातून व प्राचीन भारतीय नाट्यशास्त्रातून झाला असला तरी, कालांतराने त्यांच्यात वेगळ्या पद्धती, शैली आणि वैशिष्ट्ये विकसित झाली. खाली या दोन्हींचे विस्तृत विवेचन दिले आहे:

१. उत्पत्ती व ऐतिहासिक पार्श्वभूमी

कर्नाटक संगीत

प्रामुख्याने दक्षिण भारतात (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ) विकसित झाले.

आचार्य पुरंदरदास (१४८४–१५६४) यांना कर्नाटक संगीताचा पितामह मानले जाते.

वैष्णव भक्ती चळवळीमुळे या संगीताला भक्तिपर रंग चढला.

रचनांचा मुख्य उद्देश भक्ती व्यक्त करणे हा आहे.

उत्तर भारतीय संगीत (हिंदुस्तानी संगीत)

प्रामुख्याने उत्तर भारतात (महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, बिहार) विकसित झाले.

इस्लामी व पर्शियन संस्कृतीच्या प्रभावामुळे अनेक बदल झाले.

अमीर खुसरो (१३व्या शतकात) यांनी पर्शियन व तुर्की संगीताचे भारतीय संगीताशी केलेले संयोग महत्वाचे ठरले.

येथे राजाश्रय व दरबारी परंपरेमुळे आलंकारिक व सादरीकरणप्रधान पद्धतीचा विकास झाला.

२. रचना (Composition)

कर्नाटक संगीत

रचनांना कृती किंवा कीर्तन म्हणतात.

त्रिमूर्ती – त्यागराज, मुथुस्वामी दीक्षितर, श्यामशास्त्री यांच्या कृती प्रसिद्ध.

बहुधा संस्कृत किंवा तेलुगू भाषेत रचना आढळतात.

उत्तर भारतीय संगीत

रचनांना बंदिश म्हणतात.

बंदिश हिंदी, ब्रज, उर्दू, फarsi अशा अनेक भाषांत आढळतात.

द्रुपद, ख्याल, ठुमरी, टप्पा, गझल, भजन या विविध शैली विकसित झाल्या.

३. राग प्रणाली

कर्नाटक संगीत

रागांचे वर्गीकरण ७२ मेलकर्टा प्रणालीत केले आहे.

प्रत्येक रागासाठी ठराविक चाली व स्वरसंयोजन निश्चित.

रागाची ओळख जलद व स्पष्ट होते.

उत्तर भारतीय संगीत

रागांचे वर्गीकरण ठाट प्रणालीत (१० ठाट – विष्णूनारायण भातखंडे यांनी विकसित केलेली) केले जाते.

रागांच्या सादरीकरणात लवचिकता अधिक आहे.

रागात आलाप, तान, मींड, गमक यांच्या वापरामुळे स्वरांमध्ये गोडवा निर्माण होतो.

४. ताल प्रणाली

कर्नाटक संगीत

ताल प्रणाली अधिक गुंतागुंतीची आणि गणिती आहे.

३५ ताल, त्यातील प्रमुख – आदि ताल, रूपक ताल, मिश्रा चापू ताल.

नाडस्वर व मृदंगम वाद्यांचा तालासाठी मुख्य वापर.

उत्तर भारतीय संगीत

ताल प्रणाली तुलनेने सोपी.

प्रचलित ताल – तीनताल, झपताल, एकताल, दादरा.

तबला हे प्रमुख तालवाद्य.

५. गायनशैली

कर्नाटक संगीत

रचनात्मक (Composition-oriented).

अलापना, निरवल, कल्पनास्वर, तिल्लाना या पद्धती वापरतात.

मुख्यतः भक्तिरसप्रधान व गंभीर.

उत्तर भारतीय संगीत

सादरीकरणप्रधान (Presentation-oriented).

आलाप, बोल-आलाप, बोल-तान, सरगम, सतरंजी तान वापरतात.

रागांची अभिव्यक्ती वेळोवेळी रंगतदार व विविध रसप्रधान.

६. वाद्ये

कर्नाटक संगीत

वीणा, मृदंगम, नादस्वर, घटम्, कंजीरा, वायलिन.

वाद्ये प्रामुख्याने रचनांच्या संगतीसाठी.

उत्तर भारतीय संगीत

सारंगी, सितार, सरोद, तबला, बासरी, संतूर, पखवाज.

वाद्यसंगीत स्वतंत्र परंपरेने विकसित झालेले आहे.

७. वैशिष्ट्यपूर्ण भेद

कर्नाटक संगीत : गणिती बांधणी, शिस्तबद्ध स्वरसंरचना, भक्तिमय आशय, लवचिकता कमी.

उत्तर भारतीय संगीत : स्वरांच्या अलंकारिक खेळातून रागाची अभिव्यक्ती, रसप्रधानता, विविधता व सौंदर्यपूर्ण लवचिकता.

✅ निष्कर्ष :

कर्नाटक व हिंदुस्तानी संगीत हे एका मूळ भारतीय परंपरेचे दोन प्रवाह आहेत. कर्नाटक संगीत अधिक शास्त्रीय, बांधेसूद व भक्तिपर असून दक्षिणेकडे प्रचलित आहे. तर हिंदुस्तानी संगीत अधिक सादरीकरणप्रधान, रसप्रधान व विविधतेने नटलेले असून उत्तर भारतात प्रचलित आहे. दोन्ही संगीतपद्धती भारतीय शास्त्रीय संगीतातील अमूल्य वारसा आहेत .

*शुद्ध , छायालग , संकीर्ण राग वर्गीकरण पद्धत*
*परमेल प्रवेशक राग*
*दशविध राग वर्गीकरण पद्धत* 
*संगीत रत्नाकर यांस अनुसरून विस्तृत विवेचन द्या* 


 खालील विवेचन खासकरून शार्ङ्गदेवांच्या #संगीतरत्नाकर# (१३व्या शतक) यांच्या चौकटीत दिलं आहे; जिथे पुढीलकालीन संकल्पना (उदा., “छायालग/संकीर्ण” किंवा “परमेल-प्रवेशक”) संदर्भाने आल्या आहेत तिथे ते स्पष्ट केलं आहे.

१) शुद्ध, छायालग, संकीर्ण – राग प्रकार (ऐतिहासिक पार्श्वभूमी)

हे तीन वर्ग (शुद्ध–छायालग–संकीर्ण) स्पष्टपणे “संगीत-मकरंद” (नारद) आणि नंतर राममत्याच्या ग्रंथांत सविस्तर दिसतात; ‘रत्नाकर’मध्ये हे तीन शब्द थेट मथळा म्हणून येत नाहीत.

शुद्ध राग – शास्त्रीय नियमांना पूर्णतः अनुसरून, स्वतःच्या स्वर-संरचनेत परकीय (अन्य) स्वर न आणणारे स्वतंत्र राग.

छायालग राग – एखाद्या दुसऱ्या रागाची “छाया/आभा” घेतात; म्हणजे स्वसंरचनेत राहूनही दुसऱ्या रागाचे ठसे/चाल दिसतात.

संकीर्ण राग – शुद्ध व छायालग यांच्या मिश्रणातून सौंदर्य घेणारे (मिश्र/संकर) राग.

ही व्याख्या “संकीर्णरागमिश्राणां रागः संकीर्ण उच्यते …” अशा सूत्रांसह नारदांच्या संगीत-मकरंदमध्ये दिलेली आढळते.

‘रत्नाकर’शी जोड: रत्नाकर-पद्धतीतील उपांग-भाषांग-रागांग इ. (खाली) चौकटीत विचार केल्यास—

• शुद्ध ≈ उपांग (परकीय स्वरांशिवाय),

• छायालग ≈ रागांग/भाषा (एखाद्या रागाची छाया/अंग देणारे),

• संकीर्ण ≈ भाषांग/क्रीयांग (मिश्र/विशिष्ट चाल-क्रीयांनी ओळख ठरणारे).

(ही नातेसंबंध-निघृट मॅपिंग आहे; मूळ ग्रंथांत अशी शब्दशः समता दिलेली नाही.) 

२) “परमेल-प्रवेशक” राग

हा संकल्पना-शब्द उत्तरकालीन हिंदुस्थानी परंपरेत प्रचलित आहे; रत्नाकरातील मूलभूत वर्गांपलीकडची व्यावहारिक कल्पना.

अर्थ: दोन मेल/ठाट व दोन प्रहर यांच्या सीमेवर “पुल” घालणारे राग—ज्यात एका मेलचे स्वरप्रधानपण हळूच दुसऱ्याकडे वळवतील असे “परमेल-प्रवेशक” गुण असतात. 

उदा.

मुलतानी – दुपारच्या शेवटाकडून संध्याकाळच्या संधिप्रकाश रागांकडे नेणारा , तिव्र माचा स्पर्श हा “ब्रिज” निर्माण करतो. 

मारवा – स्वतःच्या प्रहराच्या शेवटी गाऊन कल्याण कुलातील रागांकडे प्रवेश घडवणारा. 

जैजैवंत – कामाज/काफ़ी ठाटांच्या “दोन गंधार/दोन् निषाद” उपयोगामुळे दोन्ही ठाटांची लक्षणे दाखवतो—म्हणून परमेल-प्रवेशक मानला जातो. 

ही कल्पना पं. अरविंद परिखांसह अनेक गुरूंच्या लिखाणात “मिड/ब्रिज राग” म्हणून समजावली आहे. 

३) ‘संगीत-रत्नाकर’नुसार दशविध राग-वर्गीकरण (६ + ४)

शार्ङ्गदेव रागांना प्रथम मार्ग (प्राचीन, नियमानुकूल) व देशी (क्षेत्रीय/लोकव्यवहारातून विकसित) असे दोन मोठे विभाग देतात. एकूण दहा प्रकार: मार्गातील ६ व देशीतील ४. 

(A) मार्ग (Mārga) रागांचे ६ प्रकार

ग्रामराग – षड्ज-ग्राम / मध्यम-ग्राम या प्राचीन स्केलांवर आधारित, व गिती (गायकी-शैली)नुसार भेद: शुद्ध, भिन्न, गौडी, वेसर, सामान्य/साधारणी. 

उपराग – ग्रामरागांचे उपप्रकार/भेद, लहान बदलांनी तयार होणारे. 

राग – नियमपूर्वक स्थापित मुख्य प्रकार (मार्ग चौकटीतील). 

भाषा – विशिष्ट भाषिक/प्रादेशिक अंगांनी ओळखला जाणारा प्रकार (ग्रामरागांचे उपभेद). 

विभाषा – ‘भाषा’चे उपांग/कनिष्ठ भेद. 

अन्तरभाषा – ‘भाषा’ व ‘विभाषा’ यांच्या मधला, सीमोल्लंघन करणारा भेद. 

नोंद: रत्नाकरात ग्रामरागांची चर्चा पाच ‘गिती’ (शुद्ध, भिन्न, गौडी, वेसर, साधारणी) या शैलींच्या आधारे येते. 

(B) देशी (Deśī) रागांचे ४ प्रकार

रागांग – “अंग” देणारे, स्वतःपासून इतर राग निर्माण करणारे मूळ-वर्ग; नंतरच्या परंपरांमध्ये ‘रागांग-कुटुंब’ ही कल्पना यावरच उभी आहे. 

भाषांग – अन्य/परकीय स्वर विशिष्ट ठिकाणी घेत सौंदर्य वाढवणारे; म्हणून मूळ चौकटीबाहेरील स्वरांचा मर्यादित प्रवेश असतो. 

उपांग – परकीय स्वरांशिवाय मूळ चौकट पाळणारे (आजच्या भाषेत: मेल/ठाटाच्या मर्यादेत राहणारे) राग. 

क्रीयांग – विशिष्ट क्रीयां (चाल-प्रयोग, विशिष्ट संचार/पकड)मुळे ओळख ठरणारा वर्ग. 

रत्नाकरातील राग-विवेचक अध्यायात (रागविवेकाध्याय) या मार्ग–देशी छटेखाली रागांची सविस्तर नोंद आहे; परंपरेनुसार सुमारे २६४ राग वर्णिले असल्याची नोंद अनेक अभ्यासक देतात. तसेच ग्रामरागांमध्ये पाच गिती स्पष्टपणे आढळतात. 

४) अभ्यासासाठी सारांश—‘छायालग/संकीर्ण’ व रत्नाकर यांचा मेळ

छायालग = रागांग/भाषा परंपरेची देण; एखाद्या रागाची छाया/अंग जपणे. 

संकीर्ण = भाषांग/क्रीयांग स्वर-/संचार-मिश्रणातून निर्माण सौंदर्य. 

शुद्ध = उपांग/ग्रामरागातील शुद्ध-गितीसदृश शुद्धता (परकीय स्वरांशिवाय). 

५) थोडक्यात निष्कर्ष

रत्नाकरातील दशविध पद्धत ही मूळ ऐतिहासिक चौकट: मार्ग(६) + देशी(४). 

शुद्ध–छायालग–संकीर्ण ही नंतरची शब्दावली असली तरी तिची संकल्पनात्मक जुळवाजुळव रत्नाकरातील उपांग/भाषांग/रागांग/क्रीयांग इत्यादींशी करता येते. 

परमेल-प्रवेशक राग (उदा., मुलतानी, मारवा, जैजैवंत) हे प्रहार-सीमेवर दोन ठाट/मेल जोडणारे “ब्रिज” राग—ही व्यावहारिक, उत्तरकालीन हिंदुस्थानी संकल्पना आहे.

*टिपा लिहा : कलावंत*

१. अर्थ –

कलावंत म्हणजे कला साधणारा, कलामध्ये प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती.

२. गुणवैशिष्ट्ये –

सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती असते.

सातत्यपूर्ण सराव व मेहनत करतो.

कलाप्रती समर्पण आणि भावनिक नातं असतं.

सौंदर्यदृष्टी आणि संवेदनशीलता असते.

३. कलावंताचे प्रकार –

गायक, वादक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार, नाट्यकलाकार, लेखक, कवी इ.

४. समाजातील योगदान –


समाजाला आनंद, प्रेरणा आणि संस्कार देतो.

सांस्कृतिक वारसा जपतो.

सामाजिक आणि नैतिक मूल्ये जागवतो.

५. उदाहरणे –

पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, वसंत कानेटकर, म. फ. हुसेन इत्यादी.

६. निष्कर्ष –

कलावंत समाजाचा आत्मा असतो. तो आपल्या कलेद्वारे मानवतेचा संदेश देतो आणि संस्कृतीला जिवंत

*पंडित : टिपा*

१. अर्थ –

‘पंडित’ म्हणजे विद्वान, ज्ञानसंपन्न व तत्त्वज्ञान, संगीत किंवा संस्कृती यांत पारंगत व्यक्ती.

२. गुणवैशिष्ट्ये –

विषयाचे सखोल ज्ञान असते.

विचारवंत, अभ्यासू आणि विवेकी स्वभावाचा असतो.

शिस्त, विनम्रता आणि आदर्श वर्तन पाळतो.

समाजाला मार्गदर्शन करणारा असतो.

३. संगीत क्षेत्रातील अर्थ –

संगीतात ‘पंडित’ ही उपाधी अत्यंत आदराने दिली जाते, जसे पंडित भीमसेन जोशी, पंडित रविशंकर, पंडित जसराज इत्यादी.

४. योगदान –

ज्ञानाचा प्रसार करतो.

संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करतो.

पुढील पिढ्यांना प्रेरणा देतो.

५. निष्कर्ष –

पंडित हा समाजाचा दीपस्तंभ असतो, जो ज्ञान, संस्कार आणि कलेचा प्रकाश सर्वदूर पसरवतो.

*वाग्गेयकार : टिपा*

१. अर्थ –

‘वाग्गेयकार’ या शब्दात ‘वाक्’ (शब्द) आणि ‘गेय’ (गायनयोग्य) हे दोन घटक आहेत. म्हणजेच जो व्यक्ती गीताचे बोल (साहित्य) आणि संगीत (धून) दोन्ही स्वतः तयार करतो, त्याला वाग्गेयकार म्हणतात.

२. गुणवैशिष्ट्ये –

काव्य आणि संगीत या दोन्ही कला उत्तमरीत्या अवगत असतात.

भावनांना संगीताच्या माध्यमातून सुंदर अभिव्यक्ती देतो.

रचना आणि सर्जनशीलता यात प्रावीण्य असते.

३. उदाहरणे –

संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ (अभंग रचनाकार आणि गायक)

आधुनिक काळात – पं. विष्णू दिगंबर पलुसकर, पं. विष्णूनारायण भातखंडे, हृदयनाथ मंगेशकर इ.

४. योगदान –

वाग्गेयकारांनी भारतीय संगीत व साहित्य समृद्ध केले.

भक्तीपर, शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

५. निष्कर्ष –

वाग्गेयकार हे शब्द आणि स्वर यांचा सुरेख संगम घडवणारे कलाकार असतात. ते कलेद्वारे भावना, संस्कृती आणि मूल्ये समाजापर्यंत पोहोचवतात.

*गीती : टिपा*

१. अर्थ –

‘गीती’ म्हणजे गीतप्रधान रचना किंवा गायनयोग्य काव्य. ज्या काव्यात संगीताची आणि लयची सुंदर संगती असते, त्याला गीती म्हणतात.

२. वैशिष्ट्ये –

शब्द, भावना आणि संगीत यांचा समन्वय असतो.

लय, ताल आणि भाव यांचे सौंदर्य ठळकपणे दिसते.

काव्य संगीतातून अधिक प्रभावी होते.

भावनात्मक आणि रसप्रधान अभिव्यक्ती असते.

३. उदाहरणे –

अभंग, ओवी, भावगीत, भजन, गजल, पद इ. या सर्व गीती रूपात येतात.

४. महत्त्व –

गीती काव्य मनाला स्पर्श करते, श्रोत्यांमध्ये आनंद, भक्ती किंवा भावना जागृत करते.

५. निष्कर्ष –

गीती हे काव्याचे एक मधुर, संगीतप्रधान आणि भावपूर्ण रूप आहे, ज्यात शब्द आणि स्वर यांचा सुंदर संगम असतो.

*धृपद बानी : टिपा*

१. अर्थ –

धृपद ही भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात प्राचीन आणि गंभीर गायनप्रकार आहे. धृपद गायनाच्या वेगवेगळ्या शैलींना “बानी” असे म्हणतात.

२. अर्थातील भेद –

“बानी” म्हणजे गायनाची विशिष्ट शैली किंवा परंपरा.

३. मुख्य चार बानी –

१. गौहर बानी – गंभीर, गूढ आणि विस्तारप्रधान.

२. नौहार बानी – कलात्मक गमकांचा वापर, अलंकारिक.

३. खांडार बानी – जोरदार, ऊर्जावान आणि लयप्रधान शैली.

४. दगूर बानी – कोमल, भावपूर्ण आणि मधुर गायनशैली.

४. वैशिष्ट्ये –

प्रत्येक बानीत अलंकार, गमक आणि लय यांचा वेगळा उपयोग असतो

रागाचे सौंदर्य विविध पद्धतीने उलगडले जाते.

पारंपरिक आणि गंभीर स्वरूपाचे गायन असते.

५. निष्कर्ष –

धृपद बानी या भारतीय संगीत परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. या बान्यांमुळे धृपद गायन अधिक वैविध्यपूर्ण व समृद्ध बनले आहे.

*गमकाचे प्रकार : टिपा*

१. अर्थ –

गमक म्हणजे स्वरांमधील सुंदर हालचाल किंवा अलंकार. गमकाद्वारे रागात भाव, गोडवा आणि जीवंतपणा येतो.

२. उद्देश –

गमक हे रागाला शोभा देणारे आणि अभिव्यक्ती वाढवणारे साधन आहे..

३. गमकाचे प्रमुख प्रकार –

भारतीय शास्त्रीय संगीतात साधारणपणे खालील दहा प्रकारचे गमक सांगितले आहेत :

१. त्रेेमन – स्वराचा जलद थरथर.

२. अंदोलन – स्वराची मृदू हलचल.

३. कंपन – स्वराचे थोडे थरथरणे.

४. आंदोलित – स्वराचा वर–खाली सुंदर प्रवाह.

५. लीन – स्वर एकमेकांत मिसळणे.

६. गर्जन – स्वराचा जोरदार उच्चार.

७. मुरकी – स्वरांची लहान, जलद हालचाल.

८. कण – स्वरातील सूक्ष्म स्पर्श.

९. मीनड – दोन स्वरांना ओढून जोडणे.

१०. जम्प – एका स्वरावरून दुसऱ्यावर झेप घेणे.

४. महत्त्व –

गमकामुळे रागात भावना, अभिव्यक्ती आणि कलात्मकतेचा आविष्कार होतो.

५. निष्कर्ष –

गमक हे संगीताचे अलंकार असून त्याने गायन अधिक माधुर्यपूर्ण, प्रभावी आणि रसभरित बनते.


*संगीत क्षेत्रातील वर्तमान समस्या*


 या अनेक स्तरांवर दिसतात — पारंपरिक, शैक्षणिक, आर्थिक, आणि तांत्रिक. खाली त्यांचा सविस्तर आढावा दिला आहे 👇

🎵 १. पारंपरिक संगीताचे अस्तित्व धोक्यात

आजच्या पिढीत शास्त्रीय संगीताकडे झुकाव कमी होत आहे.

पॉप, फिल्मी आणि डिजिटल संगीतामुळे पारंपरिक गायकी, वादक कला आणि घराणी परंपरा मागे पडत आहेत.

गुरु-शिष्य परंपरेचा लोप होतो आहे.

💰 २. कलाकारांच्या आर्थिक अडचणी

नवोदित कलाकारांना स्थिर उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे.

अनेक कार्यक्रम ऑनलाइन झाल्याने मानधनात घट झाली आहे.

स्वतंत्र संगीतकारांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीत किंवा त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही.

📚 ३. संगीत शिक्षणातील कमतरता

शाळा–कॉलेजांमध्ये संगीत विषयाला तितके महत्त्व दिले जात नाही.

प्रशिक्षित शिक्षक आणि योग्य अभ्यासक्रमांची कमतरता आहे.

ग्रामीण भागात संगीत शिक्षणाच्या सुविधा अत्यल्प आहेत.

💻 ४. तांत्रिक आव्हाने आणि बदल

ऑटो-ट्यून आणि सॉफ्टवेअरवर अवलंबून राहिल्याने नैसर्गिक गायनकलेचा अभाव दिसतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संगीत निर्मितीमुळे खऱ्या कलाकारांची ओळख धूसर होते आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चांगल्या दर्जाचे संगीत हरवून "व्हायरल" संस्कृती वाढत आहे.

⚖️ ५. कॉपीराइट आणि संगीत चोरी (Piracy)

गाण्यांचे अनधिकृत वापर, रीमिक्सिंग आणि प्लॅजिअरिझम वाढले आहे.

मूळ सर्जकांना त्यांचा हक्क आणि रॉयल्टी मिळत नाही.

🌐 ६. जागतिकीकरणाचा प्रभाव

पाश्चात्य संगीतप्रवाहांचा प्रभाव इतका वाढला आहे की भारतीय संगीताची स्वतंत्र ओळख टिकवणे आव्हानात्मक झाले आहे.

फ्युजन संगीतात कधी कधी मूळ राग आणि तालांची शुद्धता हरवते.

💬 ७. श्रोत्यांची बदलती अभिरुची

आजचे श्रोते जलद आणि हलकेफुलके संगीत पसंत करतात.

गहन आणि भावपूर्ण रचना ऐकणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.

ह्या सर्व समस्या असूनही अनेक तरुण कलाकार नव्या माध्यमांतून भारतीय संगीत परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत — जसे की YouTube, Spotify, Instagram इत्यादींवर शास्त्रीय व फ्युजन संगीताचा प्रसार


*रस आणि लय यांचा परस्पर संबंध*


 हा भारतीय संगीतकलेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सूक्ष्म विषय आहे. खाली त्याचे विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे 👇

🌿 रस म्हणजे काय?

‘रस’ म्हणजे कलाकृतीमधून प्रेक्षक किंवा श्रोत्याला मिळणारा आनंद, भावनात्मक अनुभव किंवा आस्वाद.

भारतीय संगीतशास्त्रात ‘रस’ हा कलेचा आत्मा मानला जातो.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात नऊ रस (नवरस) सांगितले आहेत —

शृंगार (प्रेम)

हास्य (हास्य)

करुण (दया)

रौद्र (क्रोध)

वीर (शौर्य)

भयानक (भीती)

बीभत्स (घृणा)

अद्भुत (आश्चर्य)

शांत (शांती)

संगीतातील स्वर, राग, ताल, गती आणि लय यांच्या योग्य संयोगातून हे रस निर्माण होतात.

🎵 लय म्हणजे काय?

‘लय’ म्हणजे संगीताच्या प्रवाहातील तालबद्ध गती किंवा नियमानुसार चालणारा कालप्रवाह.

ती संगीताला एक शिस्त, क्रम आणि सौंदर्य देते.

लय प्रामुख्याने तीन प्रकारची मानली जाते —

विलंबित लय – मंद गती (भावपूर्ण, गंभीर)

मध्य लय – मध्यम गती (संतुलित, स्थिर)

द्रुत लय – वेगवान गती (उत्साही, ऊर्जावान)

🎶 रस आणि लय यांचा परस्पर संबंध

रस आणि लय हे संगीताचे अविभाज्य घटक आहेत. एकमेकांशिवाय त्यांचा प्रभाव पूर्ण होत नाही.

पैलू रसाशी संबंध

लयचा वेग लय मंद असली की संगीत गंभीर, करुण किंवा शांत रस निर्माण करते. लय वेगवान असली की वीर, उत्साही किंवा हास्यरस अधिक ठळक होतो.

लयची स्थिरता लय स्थिर आणि संतुलित असेल तर संगीत श्रोत्याला रसास्वादात तल्लीन करते. लय अस्थिर असेल तर रस निर्माण होऊ शकत नाही.

राग आणि लय यांचा संगम प्रत्येक रागात काही ठराविक रसभाव असतात, आणि योग्य लय निवडल्यास तो रस अधिक उठून दिसतो. उदाहरणार्थ: राग यमनमध्ये मंद लय शांतरस वाढवते.

तालाचा वापर ताल आणि लय यांच्या एकसंधतेमुळे रस श्रोत्यापर्यंत पोहोचतो. गायक किंवा वादकाच्या भावप्रदर्शनात लय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

🎼 उदाहरणे

राग भूप मंद लयीत गायल्यास शांत किंवा भक्तिरस प्रकट होतो.

राग दरबारी कानडा मध्ये मंद लय गंभीर करुणरस निर्माण करते.

राग देशकार किंवा हंसध्वनी मध्ये द्रुत लय वापरल्यास वीर किंवा आनंदरस प्रकट होतो.

🌸 निष्कर्ष

रस आणि लय हे भारतीय संगीताचे हृदय आणि श्वास आहेत.

लय म्हणजे संगीताची गति आणि शिस्त, तर रस म्हणजे त्यातील भावनिक आणि कलात्मक अभिव्यक्ती.

योग्य लयीत सादर केलेले संगीत श्रोत्याच्या मनात अपेक्षित रस जागवते आणि त्यातून खरा संगीतानंद प्राप्त होतो.

*रस आणि लय यांचा संबंध (लघुनिबंध) 🎶*

रस आणि लय हे भारतीय संगीताचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. ‘रस’ म्हणजे संगीतामधून निर्माण होणारा भावनिक आनंद, तर ‘लय’ म्हणजे संगीताची तालबद्ध गती. लय ही संगीताला एक शिस्त, क्रम आणि सौंदर्य प्रदान करते. संगीताची लय मंद, मध्य किंवा द्रुत असू शकते आणि त्या बदलाने रसही बदलतो. उदाहरणार्थ, मंद लयीत गायन केल्यास करुण, शांत किंवा भक्तिरस प्रकट होतो, तर द्रुत लयीत वीर, हास्य किंवा आनंदरस निर्माण होतो. प्रत्येक रागासाठी योग्य लय निवडल्यास त्याचा रस अधिक प्रभावीपणे व्यक्त होतो. म्हणूनच लय आणि रस हे एकमेकांशी घट्ट जोडलेले असून, दोघांच्या समन्वयातूनच खरा संगीतानंद प्राप्त होतो .


: *छायालग रागवर्गीकरण पद्धत स्पष्ट करा :*


भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रागांचे वर्गीकरण चार प्रमुख प्रकारांमध्ये केले जाते —

शुद्ध, छायालग, संकीर्ण आणि परमेल प्रवेशक राग.

त्यांपैकी दुसरी पद्धत म्हणजे छायालग रागवर्गीकरण पद्धत होय.

🔹 अर्थ :

“छायालग” या शब्दाचा अर्थ — छाया असलेला, प्रतिबिंब पडलेला किंवा दुसऱ्या रागाचा प्रभाव जाणवणारा असा आहे.

म्हणून छायालग राग म्हणजे असा राग,

ज्यामध्ये एक प्रमुख राग असतो पण त्यावर दुसऱ्या रागाची झलक किंवा छाया दिसते.

🔹 छायालग रागाची वैशिष्ट्ये :

मुख्य रागावर दुसऱ्या रागाचा प्रभाव असतो.

म्हणजे रागाचा पाया एका रागावर आधारित असतो, पण त्याच्या गाण्यात दुसऱ्या रागाची झाक जाणवते.

स्वरसंयोजनात थोडे बदल केलेले असतात.

दुसऱ्या रागातील एखादा स्वर, वळण किंवा चलन घेतलेले असते.

दोन रागांचा भावनिक संगम दिसतो.

मूळ राग गंभीर असला तरी दुसऱ्याचा भाव येऊन राग अधिक मनोहर होतो.

रागाचे नाव प्रामुख्याने मुख्य रागावरूनच ठेवले जाते.

पण नावात कधी कधी दोन्ही रागांचा उल्लेख होतो (उदा. यमन-कल्याण).

गायन करताना दुसऱ्या रागाचा प्रभाव टाळता येत नाही, तो रागाच्या अंगातच असतो.

🔹 छायालग रागांची उदाहरणे :

मुख्य राग ज्याची छाया जाणवते तयार झालेला राग

यमन कल्याण यमन-कल्याण

भैरव तोडी ललित-भैरव

खमाज कल्याण खमाज-कल्याण

मालकंस बागेश्री बागेश्री-मालकंस

🔹 छायालग रागांचे महत्त्व :

हे राग शुद्ध रागांवर आधारित असतात, पण त्यांना नवे रंग आणि स्वरछटा देतात.

गायन-वादनात वैविध्य आणि सृजनशीलता निर्माण होते.

रागसंगीताच्या विकासात हे राग मध्यस्थ पायरी मानले जातात —

म्हणजे शुद्ध रागांपासून संकीर्ण रागांकडे जाणारा टप्पा.

🔹 थोडक्यात सारांश :

छायालग राग हे असे राग आहेत, ज्यात एक प्रमुख राग असतो पण त्यावर दुसऱ्या रागाची छाया, झलक किंवा प्रभाव दिसतो.

हे राग संगीताला भावपूर्णता, वैविध्य आणि मोहकता देतात.


*शुद्ध रागवर्गीकरण पद्धत स्पष्ट करा :*


भारतीय संगीतशास्त्रात रागांचे वर्गीकरण विविध प्रकारे करण्यात आले आहे. त्यापैकी एक महत्त्वाची पद्धत म्हणजे "शुद्ध रागवर्गीकरण पद्धत" होय. ही पद्धत प्राचीन काळातील संगीतशास्त्रज्ञांनी तयार केली असून, तिचा उल्लेख “संगीत रत्नाकर” आणि इतर ग्रंथांमध्ये आढळतो.

🔹 अर्थ :

“शुद्ध राग” म्हणजे असे राग ज्यांच्या स्वररचनेत कोणत्याही दुसऱ्या रागाचा प्रभाव दिसत नाही, म्हणजेच ते स्वतःच्या वैशिष्ट्यांवर आधारित, स्वतंत्र आणि मूलरूप असतात.

🔹 शुद्ध रागवर्गीकरण पद्धतीचा आधार :

या पद्धतीत रागांचे वर्गीकरण त्यांच्या स्वररचनेवर आणि स्वभावावर आधारित केले जाते. शुद्ध राग हे थेट स्वरसंयोजनावर (सप्तकातील स्वरांच्या रचनेवर) आधारित असतात.

🔹 शुद्ध रागांची लक्षणे :

स्वतःचा स्वतंत्र स्वभाव — दुसऱ्या रागाचा छायाप्रभाव नसतो.

मूल स्वररचना निश्चित असते — आरोह-अवरोह स्पष्ट असतो.

स्थायी व अंतरा यांचा ठराविक बांधणीचा प्रकार असतो.

गायन-वादनात स्थैर्य व गंभीरता दिसून येते.

शुद्ध स्वरांचा वापर प्रमुखपणे केला जातो.

🔹 उदाहरणे :

शुद्ध रागांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत :

राग भैरव

राग भैरवी

राग तोड़ी

राग यमन

राग कल्याण

राग मल्हार

हे राग स्वतःच्या स्वररचनेवर आधारित असून दुसऱ्या रागाचे छायाचित्र त्यात दिसत नाही.

🔹 महत्त्व :

शुद्ध राग हे इतर सर्व रागांचे मूळ मानले जातात.

पुढील काळात तयार झालेले छायालग, संकीर्ण व परमेल प्रवेशक राग हे बहुतेक शुद्ध रागांवर आधारित असतात.

त्यामुळे शुद्ध राग भारतीय रागसंगीताची पायाभूत रचना आहेत.

👉 थोडक्यात:

शुद्ध राग म्हणजे असे राग जे पूर्णपणे स्वतःच्या स्वररचनेवर आधारित असून इतर कोणत्याही रागाचा प्रभाव नसतो. हेच राग पुढील रागविकासाचे मूळ आहेत.


*संकीर्ण रागवर्गीकरण पद्धत स्पष्ट करा :*



भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रागांचे वर्गीकरण करताना चार प्रमुख प्रकार सांगितले जातात —

शुद्ध, छायालग, संकीर्ण आणि परमेल प्रवेशक राग.

त्यापैकी तिसरा प्रकार म्हणजे संकीर्ण रागवर्गीकरण पद्धत.

🔹 अर्थ :

“संकीर्ण” या शब्दाचा अर्थ — मिश्रित, गोंधळलेला किंवा एकापेक्षा अधिक गोष्टींचे मिश्रण असलेला असा आहे.

म्हणूनच, संकीर्ण राग म्हणजे असा राग जो अनेक रागांच्या स्वरांचा किंवा गुणधर्मांचा संयोग करून तयार होतो.

🔹 संकीर्ण रागाची वैशिष्ट्ये :

अनेक रागांचा संयोग :

अशा रागात दोनपेक्षा अधिक रागांची वैशिष्ट्ये, स्वरसंयोग किंवा चाल असते.

स्वररचना गुंतागुंतीची असते :

आरोह-अवरोह ठराविक नियमांनुसार नसतात.

एकाच रागाची छाया स्पष्ट दिसत नाही :

राग मिश्र असल्यामुळे मूळ राग ठरवणे अवघड असते.

गायनात विविधता आणि अलंकारिकता :

संकीर्ण राग गायनात भावपूर्णता आणि जटिलता वाढवतात.

स्वतंत्र ओळख निर्माण होते :

जरी अनेक रागांचा संयोग असला तरी हा राग स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतो.

🔹 उदाहरणे :

संकीर्ण रागांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे :

संकीर्ण रागकोणकोणत्या रागांचे मिश्रण आहेराग हमीर कल्याणहमीर + यमन कल्याणराग जोगियाभैरव + आसावरीराग मिश्र खमाजखमाज + कल्याण + बिलावलराग मधुवंतीकल्याण + पूरव

🔹 संकीर्ण रागांचे महत्त्व :

हे राग संगीताच्या प्रयोगशीलतेचे आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहेत.

गायन-वादनात भावनात्मक गूढता आणि रंगीबेरंगीपणा निर्माण करतात.

भारतीय रागसंगीताच्या उत्क्रांतीत नवीन रागनिर्मितीचा टप्पा मानला जातो.

🔹 थोडक्यात सारांश :

संकीर्ण राग हे असे राग आहेत जे दोन किंवा अधिक रागांच्या स्वरांचा आणि भावांचा संयोग करून तयार होतात. त्यांच्यात जटिलता, वैविध्य आणि सृजनशीलतेचा सुंदर संगम दिसतो.


*संगीत रत्नाकर पद्धतीनुसार “परमेल प्रवेशक राग” याविषयी सविस्तर माहिती सांगा* 


🎵 परिचय :


"संगीत रत्नाकर" हे शारंगदेव यांनी लिहिलेले प्राचीन व अत्यंत महत्त्वाचे संगीतशास्त्रीय ग्रंथ आहे.

या ग्रंथात रागांचे वर्गीकरण करण्यासाठी पाच पद्धती सांगितल्या आहेत:

शुद्ध राग

छायालग राग

संकीर्ण राग 

परमेल प्रवेशक राग

दशविध राग

🎶 परमेल प्रवेशक राग म्हणजे काय?

परमेल प्रवेशक राग हे असे राग आहेत,

जे एका मेलावर (थाटावर) आधारित असले तरी दुसऱ्या मेलातील स्वरांचे किंवा गुणधर्मांचे अंश (प्रवेश) त्यात आढळतात.

म्हणजेच —

“जे राग आपल्या मुख्य मेलाशिवाय इतर मेलाचा थोडासा प्रभाव दाखवतात, त्यांना परमेल प्रवेशक राग म्हणतात.”

🎼 उदाहरणाद्वारे समजून घेऊ:

उदा.

एखादा राग मुख्यतः खमाज थाटावर आधारित आहे,

पण त्यात कल्याण थाटाचा काही अंश (स्वर किंवा भाव) आढळतो,

तर तो राग परमेल प्रवेशक राग ठरतो.

🎤 विशेष वैशिष्ट्ये :

या रागात मूळ मेलाचे स्वर व रचना असते.

दुसऱ्या मेलातील काही स्वरांचा किंवा भावाचा प्रवेश होतो.

त्यामुळे त्या रागात मिश्र भाव निर्माण होतो.

हा प्रवेश मर्यादित असतो; रागाचे मूळ स्वरूप टिकून राहते.

🎧 उदाहरणे :

राग कल्याण – राग खमाज यांचा संगम असलेले काही राग

राग जयजयवंती, राग मिश्र खमाज इ. राग काही प्रमाणात परमेल प्रवेशक गुण दर्शवतात.

🪔 संक्षेपात:

घटक अर्थ

नाव परमेल प्रवेशक राग

अर्थ दुसऱ्या मेलातील काही स्वरांचा/भावाचा प्रवेश असलेला राग

मुख्य वैशिष्ट्य मुख्य मेलाचे स्वर आणि रचना टिकून राहतात, पण दुसऱ्या मेलाचा प्रभाव जाणवतो

ग्रंथ संगीत रत्नाकर (शारंगदे


 *संगीत रत्नाकरानुसार “दशविध रागवर्गीकरण पद्धत”*


📘 परिचय :

“संगीत रत्नाकर” हा महान ग्रंथ शारंगदेव यांनी इ.स. १३व्या शतकात लिहिला.

या ग्रंथात रागांचे विविध प्रकार व वर्गीकरण सांगितले आहे.

त्यातील एक महत्त्वाची पद्धत म्हणजे — दशविध राग वर्गीकरण पद्धत.

🎶 अर्थ :

“दशविध” म्हणजे दहा प्रकारचे राग.

शारंगदेवांनी रागांच्या भाव, स्वररचना, प्रकृती आणि उत्पत्ती यानुसार रागांना दहा प्रकारांत विभागले आहे.

ही विभागणी अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक आहे.

🎼 दशविध रागांचे प्रकार :

क्रमांक रागाचा प्रकार अर्थ / वैशिष्ट्य

1 शुद्ध राग पूर्णपणे आपल्या मेलावर आधारित, इतर रागांचा प्रभाव नसलेला राग.

2 भिन्न राग स्वरसंरचना व भावरचनेने इतरांपेक्षा भिन्न असलेला राग.

3 गौण राग दुसऱ्या रागापासून निर्माण झालेला किंवा त्यावर आधारित राग.

4 संकीर्ण राग दोन किंवा अधिक रागांचे मिश्रण असलेला राग.

5 संकीर्णाभ राग संकीर्ण रागासारखा पण मिश्रण कमी प्रमाणात असलेला राग.

6 ग्राह्य राग ऐकण्यात, गाण्यात किंवा वादनात अधिक आकर्षक वाटणारा राग.

7 ग्राम राग प्राचीन “ग्राम” पद्धतीवर (शड्ज, मध्य, गांधार ग्राम) आधारित राग.

8 उपग्राम राग ग्राम रागांपासून विकसित झालेले उपराग.

9 भाषा राग लोकसंगीत वा देशी स्वरांवर आधारित, प्रादेशिक रंग असलेला राग.

10 उपभाषा राग भाषा रागाचे उपप्रकार; स्थानिक, मर्यादित प्रभाव असलेले राग.

🎵 मुख्य वैशिष्ट्ये :

प्रत्येक रागाची स्वरसंरचना, भाव, आणि उत्पत्ती लक्षात घेऊन ही विभागणी केली आहे.

या पद्धतीने रागांचे शास्त्रीय आणि कलात्मक दोन्ही पैलू समजतात.

“दशविध” वर्गीकरणाने संगीताच्या रचनात्मक विविधतेचे दर्शन घडते.

🪔 संक्षेपात :

घटक माहिती

ग्रंथ संगीत रत्नाकर

लेखक पंडित शारंगदेव

वर्गीकरण प्रकार दशविध (दहा प्रकारचे)

उद्देश रागांचे स्वर, भाव व उत्पत्तीच्या आधारे वर्गीकारण


 *प्रसिद्ध गायिका प्रभा अत्रे यांच्या गायन शैलीचा परिचय द्या*


प्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अत्यंत नावाजलेल्या व आदरणीय गायिका आहेत. त्या किराणा घराण्याच्या प्रमुख प्रतिनिधी असून त्यांच्या गायनशैलीत या घराण्याची सर्व वैशिष्ट्ये तर आहेतच, परंतु त्यांच्या स्वतःच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यात एक स्वतंत्र ओळखही निर्माण झाली आहे.

खाली त्यांच्या गायनशैलीचा परिचय दिला आहे —

🌸 प्रभा अत्रे यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये:

किराणा घराण्याची परंपरा:

प्रभा अत्रे यांनी किराणा घराण्याचे गुरू एस.एन. राणाडे आणि सुरेशबाबू माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. त्यांच्या गायनात किराणा घराण्याचा स्वरप्रधान आणि मृदु आलापी स्वरूप स्पष्ट जाणवतो.

स्वरशुद्धी आणि नादमाधुर्य:

त्यांच्या गायनातील प्रत्येक स्वर अत्यंत शुद्ध, नादमय आणि सुबक आहे. स्वरांचा विलंबित लयीत विस्तार करण्याची त्यांची हातोटी अप्रतिम आहे.

रागदर्शनाची परिपूर्णता:

रागाची ओळख, त्याचा भाव, मूड आणि सौंदर्य ते अत्यंत सूक्ष्मतेने दाखवतात. कोणताही राग ते अत्यंत विचारपूर्वक, शास्त्रीय नियमांनुसार आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने सादर करतात.

बोल-आलाप आणि तनांचा सुसंवाद:

त्यांचे आलाप, बोल-आलाप आणि ताना यांच्यात सुंदर संतुलन दिसते. ताना वेगवान असूनही स्पष्ट आणि अर्थपूर्ण असतात.

लयबद्धतेची जाण:

प्रभा अत्रे यांना लयबद्धतेची विलक्षण जाण आहे. विलंबित तसेच द्रुत लयींमध्येही त्यांचे गायन तितकेच प्रभावी असते.

भावनात्मकता आणि शास्त्रीयता यांचा समन्वय:

त्यांच्या सादरीकरणात शास्त्रीयता आणि भावनात्मकता यांचा सुंदर संगम दिसतो. त्यामुळे त्यांचे गायन केवळ तांत्रिक न राहता मनाला भिडणारे असते.

इतर प्रकारांतील प्रावीण्य:

त्यांनी केवळ ख्यालच नव्हे तर ठुमरी, दादरा, टप्पा, भजन अशा उपप्रकारांमध्येही अप्रतिम गाणे केले आहे.

संशोधक आणि शिक्षिका म्हणून योगदान:

प्रभा अत्रे या केवळ गायिका नाहीत तर एक संगीतसंशोधक, शिक्षिका आणि लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या संशोधनामुळे किराणा घराण्याच्या परंपरेला आधुनिक स्पर्श मिळाला.

🎵 सारांश:

डॉ. प्रभा अत्रे यांची गायनशैली ही किराणा घराण्याच्या स्वरप्रधान परंपरेचा आणि त्यांच्या वैयक्तिक नवोन्मेषाचा संगम आहे. स्वरांची नजाकत, भावनांची खोली, आणि शास्त्रीय परिपूर्णता यामुळे त्यांचे गायन भारतीय संगीतविश्वात सदैव स्मरणीय राहिले आहे.

 *प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन*


 हे भारतीय शास्त्रीय संगीतविश्वातील एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी तबल्याच्या माध्यमातून भारताचे नाव जगभर प्रसिद्ध केले आहे. खाली त्यांच्या जीवनाची आणि कार्याची सविस्तर माहिती दिली आहे —

🎶 १. प्रारंभीचे जीवन

पूर्ण नाव: झाकीर हुसेन अल्ला रक्खा

जन्म: ९ मार्च १९५१

जन्मस्थान: मुंबई, महाराष्ट्र

वडील: उस्ताद अल्ला रक्खा – हे स्वतःही एक महान तबलावादक आणि पंडित रविशंकर यांचे साथीदार होते.

झाकीर हुसेन यांना लहानपणापासूनच संगीताचे संस्कार घरातूनच मिळाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी तबल्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.

🥁 २. शिक्षण व प्रशिक्षण

झाकीर हुसेन यांनी वडील उस्ताद अल्ला रक्खा यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने तबल्याचे शिक्षण घेतले.

त्यांनी पंजाब घराणा या तबला घराण्याची परंपरा पुढे चालवली.

शाळेत शिकत असतानाच ते आपल्या अप्रतिम लयबद्धतेमुळे कार्यक्रमांमध्ये वाजवू लागले.

🌏 ३. कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय ओळख

झाकीर हुसेन यांनी केवळ भारतीय शास्त्रीय संगीतातच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रकारांतही तबल्याचा अद्भुत वापर केला.

त्यांनी पंडित रविशंकर, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा, बिस्मिल्ला खान यांसारख्या महान कलाकारांसोबत वादन केले.

तसेच त्यांनी जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅकलॉफलिन, मिक्की हार्ट (Grateful Dead) यांसारख्या पाश्चात्य कलाकारांसोबतही सहकार्य केले.

🎵 ४. बँड आणि फ्युजन संगीत

झाकीर हुसेन यांनी फ्युजन संगीताची नवी लाट निर्माण केली.

त्यांनी "Shakti" या बँडची स्थापना गिटारवादक John McLaughlin यांच्यासह केली. हा बँड भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा अप्रतिम संगम आहे.

नंतर त्यांनी "Tabla Beat Science" नावाचा प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक संगीत आणि पारंपरिक तबला यांचा संगम दिसतो.

🏆 ५. पुरस्कार आणि सन्मान

झाकीर हुसेन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत —

वर्ष पुरस्कार / सन्मान दिलेला संस्थान

१९८८ पद्म श्री भारत सरकार

२००२ पद्म भूषण भारत सरकार

१९९० Grammy Award "Planet Drum" अल्बमसाठी

२००९ Grammy Award “Global Drum Project” साठी

२०१९ Fellowship Award – Royal College of Music, London युनायटेड किंगडम

२०२३ Padma Vibhushan (अपेक्षित चर्चेत) भारतीय संगीतसेवेसाठी मान्यता

🌟 ६. वैशिष्ट्ये

झाकीर हुसेन यांच्या वादनात लयबद्धतेसोबतच सौंदर्य आणि संवाद असतो.

त्यांचा तबला केवळ साथीसाठी नव्हे, तर स्वतंत्र वादनासाठी ओळखला जातो.

त्यांनी तबल्याला जागतिक स्तरावर एक स्वतंत्र वाद्य म्हणून स्थान मिळवून दिले.

त्यांच्या वादनात पारंपरिकता आणि नविनतेचा सुंदर संगम आहे.

📚 ७. शिक्षण आणि मार्गदर्शन

झाकीर हुसेन जगभरातील अनेक विद्यापीठांत व्याख्याने देतात.

त्यांनी अनेक तरुण तबलावादकांना मार्गदर्शन केले आहे.

सध्या ते अमेरिका आणि भारत दोन्हीकडे संगीत प्रशिक्षण व प्रयोग करत असतात.

💫 ८. वैयक्तिक जीवन

पत्नी: अंतार हुसैन (Kathak नर्तिका)

मुलगी: अनिसा क्वेसी, जी चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे.

🎼 ९. झाकीर हुसेन यांचे योगदान

भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

त्यांन भारतीय तालवाद्यांना आधुनिक मंच दिला.

तबल्याला केवळ साथ नव्हे तर "मुख्य वाद्य" म्हणून गौरव मिळवून दिला.

🕊️ १०. निष्कर्ष

झाकीर हुसेन हे केवळ तबलावादक नसून भारतीय संगीतसंस्कृतीचे जागतिक राजदूत आहेत. त्यांचे संगीत ही लय, भावना आणि संस्कृती यांचा संगम आहे. त्यांनी जगाला भारतीय संगीताची आत्मा अनुभवायला लावली.


 *प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत स्वरसप्तकाचा विकास*


🎵 १. प्राचीन काळातील स्वर प्रणाली (वैदिक काळ – संगीतरत्नाकरपूर्व काळ)

वैदिक काळात संगीत हे मुख्यतः सामवेद मधून विकसित झाले.

त्या काळात स्वरांची संकल्पना स्पष्ट नव्हती; परंतु उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे तीन स्वर प्रकार वापरले जात.

उदात्त – उच्च स्वर

अनुदात्त – नीच स्वर

स्वरित – मध्यम स्वर

हे स्वर सामगानात वापरले जात आणि त्यातून पुढे संगीतातील स्वरांची मुळे तयार झाली.

🎵 २. पंचस्वर काळ (सप्तस्वरांपूर्व काळ)

पुढे संगीत अधिक विकसित झाले आणि पंचस्वर प्रणाली अस्तित्वात आली.

त्या वेळी केवळ पाच स्वर वापरले जात:

षड्ज (Sa), ऋषभ (Re), गंधार (Ga), पंचम (Pa), धैवत (Dha).

मध्यकालीन भारतीय आणि ग्रीक संगीत संस्कृतीत ही पंचस्वर प्रणाली समान स्वरूपात दिसते.

🎵 ३. सप्तस्वर प्रणालीचा उदय (सांगीतिक विकासाचा टप्पा)

पुढे दोन नवे स्वर — मध्यम (Ma) आणि निषाद (Ni) — यांचा समावेश झाला.

अशा रीतीने सप्त स्वरांची (स, रे, ग, म, प, ध, नि) निर्मिती झाली.

या सात स्वरांना "सप्तक" म्हटले जाऊ लागले.

प्राचीन ग्रंथांमध्ये (जसे की नाट्यशास्त्र – भरतमुनी) हे सात स्वर स्पष्टपणे वर्णन केलेले आहेत.

🎵 ४. मध्यकालीन काळ – ‘संगीत रत्नाकर’ काळ (१३व्या शतकात)

शारंगदेवांच्या "संगीत रत्नाकर" या ग्रंथात स्वरसिद्धांत पूर्णपणे विकसित अवस्थेत दिसतो.

त्यांनी स्वरांना तीन स्थाने दिली:

मंद्र सप्तक – नीच स्वर

मध्य सप्तक – सामान्य स्वर

तार सप्क – उच्च स्वर

स्वरांना शुद्ध, कोमल आणि तीव्र अशा स्वरूपांत विभागले गेले.

या काळात श्रुती (२२ सूक्ष्म स्वरांतरं) यांची संकल्पनाही निश्चित झाली.

🎵 ५. आधुनिक काळातील विकास

आधुनिक हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत या दोन शाखांमध्ये स्वरप्रणालीचे रूपांतर झाले.

आधुनिक संगीतामध्ये सात स्वरांना तीन सप्तकांत विभागले जाते :

मंद्र सप्तक (खालचा पट्टा)

मध्य सप्तक (मुख्य गानपट्टा)

तार सप्तक (उच्च पट्टा)

स्वरांची नामावली निश्चित झाली:

स (षड्ज), रे (ऋषभ), ग (गंधार), म (मध्यम), प (पंचम), ध (धैवत), नि (निषाद).

कोमल स्वर : रे, ग, ध, नि

तीव्र स्वर : म

इतर स्वर शुद्ध राहिले.

🎵 ६. आधुनिक वाद्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव

आजच्या काळात हार्मोनियम, तानपुरा, कीबोर्ड, इलेक्ट्रॉनिक ट्यूनर्स यांच्या मदतीने स्वर निश्चित स्वरूपात शिकवले जातात.

संगणकीय सॉफ्टवेअर आणि ट्यूनिंग अॅप्समुळे स्वर-सिद्धांत अधिक शास्त्रीय आणि अचूक पद्धतीने वापरला जातो.

🪔 निष्कर्ष

प्राचीन वैदिक स्वरांचे रूपांतर होत होत सात स्वरांच्या (सप्तकाच्या) पूर्ण विकसित प्रणालीत झाले.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात त्याचा प्रारंभ,

शारंगदेवांच्या संगीत रत्नाकरात त्याचा उत्कर्ष,

आणि आधुनिक काळात त्याचे वैज्ञानिक व सुसंस्कृत रूप असे स्वरविकासाचे टप्पे आपण पाहतो.


 *सारणा चतुष्टीचे भारत आणि शारदेव यांनी केलेल्या प्रयोगाचे विवेचन*


🪷 १. ‘सारणा चतुष्टी’ म्हणजे काय?

‘सारणा चतुष्टी’ हा प्राचीन भारतीय नाट्यशास्त्रातील एक महत्त्वाचा संकल्पना समूह आहे.

भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्रात’ आणि नंतर शारदेवाच्या ‘संगीत रत्नाकरात’ याचा विस्ताराने उल्लेख आहे.

‘सारणा’ म्हणजे रसाची उत्पत्ती किंवा वृद्धी करणारे घटक आणि ‘चतुष्टी’ म्हणजे चार —

म्हणजेच रसाची उत्पत्ती व वृद्धी करणारे चार साधनरूप घटक.

🎭 २. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार सारणा चतुष्टी

भरतमुनींनी नाट्यशास्त्रात रसोत्पत्तीचे चार आधार सांगितले आहेत :

हेच ‘सारणा चतुष्टी’ म्हणून ओळखले जातात.

क्रमांक घटक अर्थ / स्पष्टीकरण

विभाव (Vibhāva) रस उत्पन्न करणारे कारण; जसे नायक, नायिका, प्रसंग, स्थान, काल इ.

अनुभाव (Anubhāva) मनातील भाव बाहेर व्यक्त करणारी लक्षणे — हावभाव, नेत्र, अंगविक्षेप इ.

व्याभिचारी भाव (Vyabhicāribhāva) अल्पकाळ टिकणारे सहायक भाव — जसे उत्सुकता, लज्जा, रोष, विस्मय इ.

स्थायी भाव (Sthāyibhāva) मनात दीर्घकाळ राहणारा मूलभूत भाव — जसे प्रेम, शोक, क्रोध इ.

👉 या चार घटकांच्या संयोगातून रसाची उत्पत्ती (रसनिष्पत्ती) होते.

म्हणजेच, सारणा चतुष्टी म्हणजे रसनिर्मितीची मूलभूत चौकट.

🎶 ३. शारदेवाच्या ‘संगीत रत्नाकर’ मधील प्रयोग

शारदेव (१३व्या शतकातील संगीताचार्य) यांनी ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात

भरतमुनींच्या या सिद्धांताला पुढे नेले आणि संगीतशास्त्राशी त्याचे नाते जोडले.

शारदेव यांनी सांगितले की, रस निर्माण फक्त नाटकातच नाही, तर गानातही होते.

म्हणून त्यांनी संगीतातील रसोत्पत्तीचेही चार आधार या सारणा चतुष्टीच्या स्वरूपातच मांडले.

घटक संगीताच्या संदर्भातील अर्थ

विभाव राग, ताल, शब्द, स्वर, वाद्यसंगीत हे रसोत्पत्तीचे कारण.

अनुभाव गायकाचे मुखविन्यास, स्वरच्छाया, लयातील हालचाल, भावप्रदर्शन.

व्याभिचारी भाव गायकाच्या मनातील क्षणिक भावना – हर्ष, करुणा, विस्मय यांचे सूक्ष्म प्रकटीकरण.

स्थायी भाव श्रोत्याच्या मनात निर्माण होणारा मुख्य भाव – म्हणजेच रस (शृंगार, करुण, वीर इ.)

👉 अशा रीतीने शारदेव यांनी भरतमुनींच्या नाट्याधारित सिद्धांताला संगीतशास्त्रीय संदर्भात विस्तारित केले.

💠 ४. भरत आणि शारदेव यांच्या प्रयोगातील तुलनात्मक विवेचन

पैलू भरतमुनी शारदेव

ग्रंथ नाट्यशास्त्र संगीत रत्नाकर

क्षेत्र नाट्य आणि अभिनय कला संगीत आणि गानकला

उद्देश रंगमंचावर रसोत्पत्ती गानातून रसोत्पत्ती

प्रयोग नट, संवाद, हावभाव यांच्या साहाय्याने राग, स्वर, लय, भाव यांच्या साहाय्याने

परिणाम प्रेक्षकात रस उत्पन्न होतो श्रोत्यात रस उत्पन्न होतो

🌸 ५. निष्कर्ष

सारणा चतुष्टीचा प्रयोग म्हणजे रसोत्पत्तीचे तत्त्वज्ञान.

भरतमुनींनी नाट्यकलेतून त्याची मांडणी केली,

तर शारदेवांनी संगीतकलेतून त्याचा विस्तार व सैद्धांतिक विकास केला.


दोघांनीही मानवी भावविश्वातील रस निर्माण करणाऱ्या घटकांचे विवेचन वेगवेगळ्या कलाप्रकारांच्या संदर्भात केले —

यातून भारतीय कलाशास्त्रातील रससिद्धांताची सार्वत्रिकता आणि गूढता स्पष्ट होते. 🎵