लाॕकडाऊन डायरी प्रकरण 4
भाग 16 ते 20
क्रमशः भाग 16
नृसिंह जयंती आणि वैशाखी हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडेच असल्याने याला थोडसं सणाचं स्वरुप येतं . गेल्या 30 वर्षात फक्त जवळच्या नातेवाईकाच्या लग्न/मुंजीला गेल्यामुळे 2/3 वेळी मी नव्हते . नाहीतर आम्ही सगळे एकत्र वैशाखी करतो विशेष म्हणजे आत्याकडे ( मुलांची प्रतिभा आत्या ) नसल्यामुळे त्या दरवर्षी येत असतात . त्यांची उन्हाळ्याची सुट्टी परांड्यात असते . पण लॉकडाऊनमुळे त्याही पुण्याहून येऊ शकल्या नाहीत .सध्या काका-काकी मात्र नेहमीप्रमाणे त्यांची वाट पहातात . लॉकडाऊन कधी संपणार विचारतात . काय सांगावे त्यांना ? बालपण आणि म्हातारपण सारखेच असतं म्हणतात . त्यामुळे मुलांच्या भेटीसाठी त्यांनी अतुर आसणं सहाजिकच आहे पाहू आता सुरळीत होण्याची वाट पहाणे .
पुर्वी सणाला आम्ही परांड्याला जायचो हल्ली सगळे बार्शीला असतात . काका-काकी परांड्यात आम्ही बार्शीत असं कधी होत नाही . हल्ली मुलांच्या रजा /परिक्षा यामुळे त्यांना कधीकधी यायला जमलं नाही पण एकत्र असण्याचीच सवय आहे . यावेळी आशिष-किर्ती आकांक्षा घरी आहेत पण काका-काकी नाहीत ती रुखरुख मनाला लागली . फोनवरून बोलणं झालं फक्त .
तसं काकींच कडक सोवळं , व्रत-वैकल्य , कडक उपवास आशी धाटणी होती . कट्टर मराठवाडी बाणा ! त्या नेहमीच आत्मकेंद्रीत राहिल्या . फारसं स्पष्टपणे बोलणं नाही .पण त्यांनी मला हे करण्याचा आग्रह कध्धीच केला नाही . त्या स्वतः करत रहायच्या . तयारी करुन ठेवायच्या करावे आशी अपेक्षा मात्र स्पष्ट जाणवायची . मी पण ते आनंदाने केलं आजुनही करते . आता काळही बदलला आहे व्याप वाढला आहे . मग मी पण त्यात सोयीस्कर बदल करत आणले आहेत . पण मी करेल ते चालवून घेतात सगळेजण . काळानुरुप चालणं गरजेचं आहे हे सर्वांना पटते त्यामुळे सणवार पण एखाद्या समारंभासारखा करण्याचा माझा प्रयत्न आसतो . थोडाफार पुढच्या पिढीचा पण विचार करायला हवा . कोणतही औडंबर न वाटता समाधान मिळालं पाहिजे ! आईचं थोडफार सोवळं असायचं ते लहानपणी पाहिलेले . एकूणच सुवर्णमध्य साधण्याचा माझा प्रयत्न आहे .
काकांच मात्र बिनबोभाटपणे काम सुरु असतं . याही वयात ते स्वस्थ बसत नाहीत त्यामुळे त्यांची तब्बेत व्यवस्थित असते . थोडा अस्थम्याचा त्रास पहिल्यापासून आहे . 70 वर्षापूर्वीचे ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजचे ग्रॕज्युएट आहेत . इंग्लिशवर चांगली कमांड आहे . काकी पण त्यांना सातवीत मिळालेल्या स्कॉलशिपवर केलेली ही अंगठी आहे असं बोटातली आंगठी दाखवून म्हणत असतात . गेल्या 30 वर्षापासून मी पहाते या दोघांच्याही तब्बेती आशाच तुडतुडीत आहेत . आत्या व काका पण तशेच . आमच्या घरातला एक निखळलेला तारा म्हणजे काका ( सुनिल भाऊजी ) . त्यांच्या आकाली जाण्यांने उलटसुलट घडल्यांने नको त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले .आशिषच्या लग्नाच्यावेळी आई-काका व सुनिल भाऊजी-सुखदा यांच्या उणीवा प्रकर्षाने जाणवल्या . त्यात्यावेळच्या भावना पण मी लिहून ठेवल्या आहेत . भाऊजींची मात्र उणीव नेहमीकरता भासतच रहाते . उतारवयात काका-काकींना रुखरुख आहे . पाडवा , वैशाखी , गौरी-गणपती , दसरा , दिवाळी या सगळ्या सणाला आम्ही एकत्र आसतो . मुलांशी काकाच आतूट नातं होतं . त्यामुळे आशाप्रसंगी मनात घालमेल होते व या सगळ्या आठवणी प्रकर्षाने होतात. काळ हेच यावरचं औषध आहे !
पण यावर्षी घरात आकांक्षा , नविन जोडी असल्याने वातावरण छान होतं . कोरोनामुळे सगळे सोपस्कार घरातल्या घरात पार पडले तरी नृसिंह जयंतीला सगळ्यांनी छान आवरुन तयार झालो सगळ्यांनी उपास केलेला मग थंडगार खरबूज पन्हं थोड्या गप्पा रात्री जेवण असा कार्यक्रम पार पडला . कीर्तीला हे सगळं नविन होतं पण सगळीकडे कुतुहलाने निरीक्षण व शंका विचारणं सुरु होतं . दुसरेदिवशी पुरण होत त्यामुळे मग ते तर तीच करणार हे तिने ठरवून टाकलेलं .याठिकाणी आपला नंबर लागू शकत नाही हे आकांक्षाला माहित होत म्हणून आदले दिवशीचं मी करणार हे तिने ठरवलं . त्याप्रमाणे दोघींनी आपला नंबर येण्याची वाट पाहिली . त्यामुळे यावर्षी स्वयंपाकाला बाई नव्हती तरी उत्साहानं स्वयंपाक झाले तेही उत्तम !!चला कोरोनाच्या निमित्ताने हाही एक प्रयोग !! काम टाळण्यासाठी नाही तर करण्यासाठी दोघांचीही चढाओढ आसते . कीर्तीकडून नेहमीच काहीतरी केलेलं ऐकायला मिळतं त्यामुळे केतकी आई-बाबा , आजी , आत्या ,मावशा सगळेजण ऐकायला उत्सुक असतात .खुप कौतुक वाटतं सगळ्यांना . आता आम्हांला केव्हा तुझ्या हातचं खायला मिळणार असं बोलणं चाललेले आसतं . ती पण खूप उत्सुकतेने वाट पहातेय मी कधी हे करुन घालणार सगळ्यांना . इकडे आमच्या फॕमिली ग्रुपवर पण सगळे रोज फोटोची वाट पहात आसतात . आणि मग चर्चांना उधाण येतं . सध्या आमच्या ग्रुपला
" आम्ही सारे खवय्ये "
आसं नाव द्यावसं वाटतय .चला आता लॉकडाऊन संपायची वाट पहायची . आता लवकर कोरोना निर्मुलन होऊन जनजिवन सुरळीत व्हायला पाहिजे आसं वाटतय खरं !!!
क्रमशः भाग 17
सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये आहे पण कोरोनाबाधित रुग्ण सोलापूर शहरात आहेत त्यामुळे शहर वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी लॉकडाऊन मध्ये थोडीफार शिथिलता आणली आहे . 3 मे नंतर बार्शीत हळुहळु तुरळक दुकाने उघडत होती . ब-याच दिवसांनी फोन करुन पहिल्यांदा चष्म्याच दुकान गाठलं . फ्रेम तुटल्यामुळे एक महिन्यापासून स्पेअरमधला चष्मा वापरतेय पण रोजच्या सवयीचा चष्मा मला हवा आहे . तो मिळेल आता सोमवारी . उकाडा वाढतच होता . वैशाख महिन्यात 43/44 तापमान असतेच . त्यामुळे हैराणी होत होती . आशिष-किर्तीला रात्री झोप होईना . पिळून निघाल्या सारखे व्हायचे .आंम्ही दुकानदाराला आधीच फोन करुन ठेवला होता त्याप्रमाणे आम्हांला 3/4 तारखेला एसी आणता आला . त्यामुळे त्यांना चढता उन्हाळा सुसह्य होऊ लागला . सगळ्यांना हुश्श्य झालं . आणि तापमानांन रोजचा 44 चा पारा गाठला , 8 दिवसांपासून धगधगत्या भट्टीसारखं वातावरण होतं , पण आम्हांला एसी व कुलरमुळे थोडीफार त्यावर मात करता आली .
आज रविवार 10 मे सगळ्यांनाच सुट्टी ! आज दुपारी परवाच्या राहिलेल्या पुरणाच्या गरम पोळ्याचा बेत होता .पुरण मुरल्यामुळे जायफळ आणि वेलचीचा जरा जास्तच कैफ चढला होता . त्यामुळे सगळ्यांनी दुपारी ताणून दिली . 4 वाजता इतके झाकाळून आलं , विजांचा कडकडाट होऊ लागला , सोसाट्याचा वारा सुटला तसे जागे होत सगळेजण कट्ट्यावर येऊन उभे राहिले आणि वातावरणाचा रंग पाहून चातकासारखी पावसाची वाट पाहू लागले . काळेकुट्ट ढग मधुनच पळत होते पाऊस पडेल की पळूल जाईल असं वाटत असतांनाच पावसाला सुरुवात झाली . आणि आर्धा तास तुफान पाऊस ! सुरुवातीला तप्त मातीवर पावसाचे थेंब आणि त्याचा येणारा सुगंध हाव-यासारखा सगळ्यांनी घेतला थोड्याच वेळात सगळीकडे पाणीचपाणी ! समोर मैदांनावर रस्त्यावर पाणी सुसाट पळू लागलं . क्षणभर वाटलं परवाच नृसिंह जन्म झालाय . हिरण्यकश्यपूचा वध केल्याप्रमाणे कोरोनाचा वध तर होत नाही न ? बघता बघता वाटू लागलं या वाहत्या पाण्यातून कोरोनाला वाहून घालवण्यासाठी हा पावसाचा घाट घातला आहे का ? इतका पाऊस पडून आकाश निरभ्र झालंय तशी या पावसात पृथ्वी कोरोनामुक्त होईल का ? काही सांगता येत परमेश्वराची लिला अगाध आहे . माणसांने विज्ञानात खूप प्रगती केलीय , सगळं मुठीत घेतलंय असं म्हणत आसतांना सगळं फोल ठरवत एका झटक्यात मुसक्या आवळल्या गेल्यात जग काही दिवस नव्हे तर अनेक महिने मागं गेलंय . सगळी पृथ्वी माझीच म्हणणा-या माणसाला त्याची जागा दाखवलीय . असो निसर्गाचा समतोल साधला जावा व पुर्ववत आयुष्य सुरु व्हावे एवढी अपेक्षा . कारण आपण इतका पैसा , वीज वापरुन मिळणारा एसीचा थंडावा आणि 10 मिनीटांत निसर्गाने दिलेला गारवा ! आहाहा !! निसर्गाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही . बार्शीला 3 दिवसांनी पाणी येतं त्यामुळे झाडांना दिवसभर इतकं उन पेलल्यावर रोज सकाळी त्यांच्या बुडाशी आर्धी बादली पाणी मिळायतंय त्यामुळे कशीबशी तग धरुन आहेत ती . पण शेवटी निसर्गच तो ! आर्ध्या तासात वातावरण इतकं बदललं की माणसं सुद्धा सगळी लहान मुलसारखी उल्हासीत झाली . आकांक्षा-कीर्तीने पहिल्या पावसात भिजायचा आनंद लुटला तर दवबींदू पकडायला मनिषचा कॕमेरा सज्ज झाला . पोर्चमध्ये खुर्चीवर बसून आम्ही दोघेही या आनंद सोहळ्यात सामिल होत होतो . काहीतरी काम करण्याच्या निमित्ताने पावसात पळत जाऊन परत येण्याचा मोह आम्हांला पण नाही आवरता आला . आशिष-किर्ती मधुनच आपल्या पावसाळ्यात ट्रेकींगचं नियोजन केलं आहे त्याचं काय होणार हा विचार करतकरत या क्षणी पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागाले . पावसात सगळे गार झाले आणि जे वातावरण निर्माण झाले ते पाहून अनुभवुन लगेचच आकांक्षाला कदमची भजी , देशपांडे वडेवाले आठवले सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं . पण काहीच मिळणार नव्हते . फक्त चर्चा करुन गाप्प बासावे लागणार होते . मग एकमेकांकडे पहात सगळ्यांना डोळ्याची भाषा उमगली आकांक्षा-कीर्तीने पळत स्वयंपाक घर गाठलं . घरात ब्रेड होताच मग बघता बघता गरमागरम ब्रेड पकोडे आणि वाफाळलेला चहा तयार झाला त्याचा अस्वाद घेऊन सगळे तृप्त झाले . पुन्हा कॕरम आणि रात्री कट्ट्यावर बसून आईस्क्रीम आणि गप्पा . पण पुन्हा कोरोनामुक्तीची अपेक्षा करत सध्यातरी कोरोनासाठी आवश्यक असलेली काळजी घेत काम करण्याचा निश्चय करत शुभरात्री केल ! कारण कालच प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी
" कोरोनाशी लढतांना अर्थाचा भार पेलतांना "
या संघटनेनी आयोजित केलेल्या फेसबुक संवादात सहभागी होऊन मनोधैर्य वाढवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेपर्यंत लस निघेपर्यंत वाट पहावी लागणार आहे ! त्यांनी सांगितले आहे तुर्तास 2020 च कॕलेंडर मनात गुंडाळून ठेवा . मनोधैर्य वाढवा , परिस्थिती जेवढी लवकर निवळेल तो आपल्याला मिळालेला बोनस समजा म्हणजे हे बुडतंय अशी रुखरुख नाही लागणार . चला मग सकारात्मकतेने कामाकडे वाटचाल !!
क्रमशः भाग 18
कोणत्याही नवीन गोष्टीचा अनुभव घेताना
" नव्याचे नऊ दिवस "
म्हणत रोज नवा अनुभव देऊन जातो . आणि कोणतीही मानसिकता तयार व्हायला परिस्थिती मान्य करायला 21 दिवस लागतात असे म्हणतात . कोरोनाच्या बाबतीत तसंच झालं म्हणायला हरकत नाही . ही एक आपत्ती आहे हे सर्वांनाच माहित होतं पण तोही सगळ्यांना पहिलाच अनुभव की ! सगळे फक्त ऐकून होते .
" दुरुन डोंगर साजरे "
या उक्तीप्रमाणे संकट पण लांब असेल तर त्याच्या झळा फारशा नसतातच . 22 मार्चला एक दिवसाचा कर्फ्यु जाहीर झाला . दिवसभर बाहेर न जाता 5 वाजता सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या . पाठोपाठ संकट दारात येऊन उभं ठाकलं म्हणलं की परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पहिला लाॕकडाऊन जाहीर झाला . संमिश्र भावना होत्या सगळ्यांच्या . रोजच रुटीन गर्रकन वळुन पुर्णपणे वेगळीच जिवनशैली सुरु झाली . गरगर फिरणार जिवनचक्र कुठल्यातरी शक्तीने जगच्या जागी रुतवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली .
लहान मुल रडरड रडतं मधुनच त्याला आनंद वाटेल असं काही दिसलं की रडतरडत ते हसायला लागत डोळ्याबरोबर नाकातून पाणी गळत असतं रडूनरडून दमलेलं असतं ते . डोळे आणि गाल लालबुंद होतात आणि थकवा येतो मग झोप येते . त्याला काहीच कळत नसतं तशी माणसाची अवस्था कोरोनामुळे या लॉकडाऊनमध्ये झाली . काय होतय तेच कळेना . सगळेच घरात बंदिस्त आहेत काहीच काम नाही काही पण भरपूर कामं आहे . नातेवाईक , स्नेही , सहकारी यांच्याशी फोनवरून गप्पाटप्पा मेसेजेस वेगवेगळ्या पाककृती , विविध कलाविष्कार, लिखाण , कविता तसंच भावनांच पण होतय . हसताहसता एकदम गंभीरपणा भितीयुक्त वातावरण निर्माण होतं असं एक न दोन अनेक आविष्कार ! व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत एवढ खरं .
इकडे जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल तसातसा दुसरा तिसरा आणि आता चौथा लॉकडाऊन सुरु झाला . तोतो माणसाचा धीर सुटत गेला तेचतेच करायचा कंटाळा पण आला तर इकडे हातावरच पोट असणारांना पोट स्वस्थ बसू देईना . मग गावाकडे जाण्याची धडपड मिळेल त्या वहानाने , गाडीने , सायकलवर प्रसंगी चालत लहान , मोठे, स्त्री-पुरुष सगळेच प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे आपापले निर्णय घेऊ लागले . शासनव्यवस्थापण तोकडी पडू लागली . माणूसच तो थोड्याफार फरकाने प्रत्येकाची विचारसरणी अशीच होत गेली आज 26 मे म्हणजे जवळजवळ सव्वादोन महिन्यांपासून परिस्थिती अशीच आहे फक्त मानसिकता बदलत गेल्या . पण सध्या इकडे तरी उलटच चाललय सगळं . कोरोना वाढतोय तसं वातावरण शिथिल होत चाललंय पण एक मात्र नक्की माणूस स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला , कोरोनासह जगायला शिकायची धडपड करताना दिसू लागलय . परिणाम काय होईल हे आज तरी सांगता येत नाही पण जनजिवन सुरु करावं लागणार हे नक्की . कारण आपल्या रोजच्या व्यस्ततेतून 2/3 दिवस वेळ काढायला सुद्धा तयार नसणारी माणसं 2 महिन्यांपासून जागच्या जागी थांबलीत , घरात आहेत .
आशिष-कीर्ती , आकांक्षा आणि आम्हीसुद्धा याला अपवाद असू शकत नाही . यापरिस्थितीत एकत्र आहोत , नविन नाती जगता येतात नवनवीन पाककृती शिकायला व शिकवायला मिळतात त्याचा आनंद आहे . विचारात व परिसरात मोकळेपणा आहे लांब असण्याची काळजी नाही . तशी कामं सगळ्यांना आहेत . पण रोज तेच कपडे घालायचे व समोर लॕपटाॕप घेऊन घरातच आपापल्या जागेवर बसायचं . तसा टाईमपास पण चांगला होतो कॕरम ,पेटी , टीव्ही गाणी . तसं बार्शीत तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये बरीचशी शिथिलता होती . इकडे रुग्णसंख्या ठराविक ठिकाणी वाढतेय पण वातावरण आणि परिसरातील स्थिती पाहून नियमात शिथिलता येतेय . बार्शी तसं सुरक्षित आहे पण परगावच्या लोकांची ये-जा वाढली त्यामुळे काळजी पण वाढते . पाठोपाठ चौथा लॉकडाऊन जाहीर झाला पण बाहेर लोकांचे व्यवहार ब-यापैकी सुरळीत झालेत . घरात मात्र तेचतेच करायचा कंटाळा येऊ लागला आहे . फारसं नविन काही घडत नाही तर रोज तेच काय लिहावं म्हणत माझ पण लिखाण बंदच आहे .
परवा सहज गप्पा मारत बसलो . लग्नानंतर कीर्तीची मिरजेला 2 दिवस येतीजाती झाली व तिचे आई-बाबा पुण्याला अगदी धावती भेट देऊन गेले त्यानंतर प्रत्यक्ष भेट कोणाचीच झाली नाही . केतकी तर लगेचच कोकणात गेली . माहेरी गुजगोष्टी , हितगुज करायला कीर्तीला वेळच मिळाला नाही . मध्येच केतकी तिकडे आजारी पडली मग बाबा व पुन्हा आई असे आजारपणाचे सगळ्यांचे नंबर झाले . फोन झाला की मला सगळं सांगायची . बाबांची तब्बेत बरी नव्हती तेव्हा म्हणाली नेहमीसारखं असतं तर विकेंडला मिरज ट्रीप झाली असती . तेही बरोबरच आहे लांब असलं की हुरहुर लागते मनाला तेच प्रत्यक्ष भेटीने समाधान होते तिची तगमग मला उमजत होती . मला वाटलं थोडी घालमेल तर होतच असणार तिची म्हणून तिच्या मनात हळुवारपणे डोकावायचा प्रयत्न केला . जरा गप्पा मारल्या थोडेसे मग तिला जरा बोलतं केलं . पण परिस्थितीप्रमाणे विचार करते ती असं जाणवलं . आणि एकूणच आम्ही गप्पा मारतांना , मैत्रिणी , नातेवाईक यांच्याशी बोलताना आत्ताच्या घडीला आपला लग्न समारंभ झाला , फिरुन येणं अगदी व्यवस्थित पार पडलेय सगळे सोपस्कार पार पडलेत त्यामुळे तसा ताण कोणाच्याही मनावर नाही व आतातर बार्शीत एकत्र रहाता येतय हेच खूप महत्त्वाचे आहे स्थिरता तर आहे होईलच की हळुहळु सुरु अशा तिच्या भावना आहेत . बरं वाटलं मला पण मोकळेपणानं बोलल्यामुळे . नविन आहे निश्चिंतपणे तिने रहावं असेही वाटते .आई-बाबांशी फोनवर होतात गप्पा . भेट झाल्यासारखे वाटावे तेवढंच मनाचं समाधान म्हणत कधीकधी video call कधीमधी आजी , आत्या , मावशीबरोबर गप्पा होतात . पण एकंदर खुष आहे काळजी नाही हे जाणवलं .
दुकाने उघडली म्हणल्यावर मागच्या आठवड्यात आम्ही दुपारी जरा बाहेर जाऊन आलो . तेचतेच कपडे त्यांना घालायचा व मला पहायचा कंटाळा आला म्हणून थोडीफार खरेदी केली . आल्यापासून मनिष तर बाहेर गेलाच नव्हता . सगळे फिरुन आले म्हणल्यावर त्याला पण काहीतरी वाटलं आणि बसल्या बसल्या रविवारी तो म्हणाला
काय बाबा कायकाय ठरवलेलं मी विकेंडला पिक्चर पहायचा , हॉटेलमध्ये जायचं आता पावसाळा सुरु झाला की मस्त ट्रेकिंगला जायचं गाडीवर बसून लांब फिरुन यायचं तर कधी फोर व्हीलरनं लाँग राईड मारायची . ते एकदम बंद आणि हे काय झालं बाबा कंटाळा आलाय आत्ताच्या आत्ता बाहेर जावसं वाटतंय . म्हणलं उठ आणि गाडीवर गावाबाहेरुन एक चक्कर मारुन या दोघेजण .या घडीला तर तेवढंच शक्य आहे मग जाऊन आले दोघेजण बायपासवरुन चक्कर मारुन . फार बरं वाटलं बाहेर चक्कर मारल्यावर म्हणाला .
मागचे 8/10 दिवस झाले कीर्ती-आकांक्षा माझ्या मागे लागल्यात क्रमशः पुढचा भाग येत नाही का लिहीत नाही . आलाच पाहिजे . कीर्ती तर म्हणाली सुगारणपणा छान लिहीलात आता बिघडलेलं पण लिहा की . भविष्यात ते वाचायला मजा येईल . आणि हो ते तुमच्या भाषेत सांडग्याची माझ्याकडून झालेली "राखुंडी" किंवा पोळीभाकरीच
" दुपटं " हे पण वाचायला आवडेल . तसे माझे असे अनेक शब्द आहेत की जे आईकडून वारसा हक्काने आलेत ते आम्हा बहिणींमध्ये ! सगळे एकत्र जमलो की हमखास ते शब्द ती वाक्य वापरल्याशिवाय भेट झाल्यासारखे वाटत नाही . आमची मुलं तर त्याच्या पुढची पायरी आहे . हळुहळु अनुश्रीला माहित झालंय पण सलग दोन महिने सहवासात आल्यामुळे कीर्तीला माझे बरेचसे ठेवणीतले शब्द काही वाक्यं माहित झालीत . काहीकाही किस्से फोड करुन सांगावे लागतात . तिला त्याच्या मागचे किस्से सांगितले की मग मजा येते . मनिष म्हणतो आई ब-याच गमतीजमती हीला माहिती व्हायला 2/3 वर्षे लागली असती पण हीला तर सहा महिन्याच्या आत सगळे माहित होतय . आसुदे म्हटलं " ठब्ब " परिवारात लवकरच मिक्स होतीय ती ! ठब्बचीही वेगळीच कथा आहे !!
ठीक आहे उद्या लिहिते म्हटलं आगोदर मला जरा आलेली मरगळ तरी झटकू दे . मग ताजतवान होऊन तुझ्या बिघडलेल्या पदार्थांचा स्वाद पुढच्या भागात चाखू !!
क्रमशः भाग 19
माझी आई आणि पाककलेच शास्त्र !!
माझी आई म्हणजे साक्षात अन्नपुर्णेचा वरदहस्त लाभलेली जणू लक्ष्मीच ! साधा शिळ्या पोळ्याचा चुरा करुन कांदा , भरली मिरची घालून चरचरीत फोडणी टाकली तर आहाहा काय खमंग वास येतोय म्हणत सोप्यात बसलेल्याने स्वयंपाकघरात आलच पाहिजे . किंवा तोंडाला चव नाही म्हणत काही न खाता वाड्यात झोपलेल्या आजारी माणसाला तिने पेज करुन दिली तर ती पिऊन तरतरी आली बाबा म्हणत त्यांन उठून बसलंच पाहिजे . तसंच काही सण समारंभाला केलेला साग्रसंगीत स्वयंपाक असो की साधं लसूण मेतकूट घालून केलेलं खुमासदार भडंग असो . मसाले , मेतकूट , चटणीपूड , सांडगे , मुरांबे लोणच्यासारखे वार्षिक पदार्थ असो की दिवाळीचा तिखट-गोड फराळ असो . एक न दोन कित्तीतरी पदार्थ तिने करावे आणि खाणाराने तृप्तीची ढेकर द्यावी . प्रत्येक पदार्थाला तिच्या हातची खास चव असायची . मन लावुन करण्याची तिची पद्धत होती . त्याहीपेक्षा समोरच्याने मनापासून खावे व तृप्तीची ढेकर द्यावी अशी त्या नवराबायकोत ( आई-काकामध्ये ) जणू स्पर्धा असायची . बाजार आणण्याचा काकांचा उत्साह तर त्याचं अमृत करुन समोरच्याला तृप्त करण्याचा आईचा स्वभाव .
घराजवळून जातायेता दिसणारी एखादी सून असो लगेच तिला
"बस दोडा 2 घास खाऊन जा "
असं म्हणत हाताला धरुन बसवुन खायला घालायचं नाहीतर एखादी माहेरवाशीण आलेली दिसली की
" नवजुनं दिसतंय तुझ्याकडे बस दोडा घटकाभर खाऊन जा "
असं म्हणत काहीतरी डीशमध्ये घालून डीश पुढ्यात ठेवली जायची पुन्हा
" घे आजून एक तुकडा "
म्हणत आग्रह करायची . कामाच्या बायकांना
" आधी दोन घास पोटात घाल मग पाणी पिऊन काम कर "
असं म्हणणार . सढळ हाताने करण्याची दोघांचीही वृत्ती तिथे त्यांनी हिशोब कधी केलेला मी पाहिलाच नाही .
आपण कोणताही पदार्थ करताना सात्त्विक भाव ठेवावा जशी आपली मनाची अवस्था असते तीच चव पदार्थात उतरते असं ती म्हणायची . म्हणून घरच्या बाईने समाधानी वृत्ती ठेवली तर घर समाधानी असतं असं बारिकसारिक गोष्टी तिने मनावर लिलया बिंबवल्या . संस्कार असेच घडत असतात हाताला धरुन नाही करावे लागत . आईचं अध्यात्माचं अफाट वाचन होतं कोणतही औडंबर न करता काळाबरोबर चालणारी सर्वसमावेशक वृत्ती असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते तिचे .
तिच्याकडून पदार्थ करायला शिकायचं हे मुली म्हणून आम्हीच नाही तर पुतण्या , सुना , जावा , नाती , शेजारी , स्नेही आणि कोणीही उत्सुक असायचं . कोणीही घरी आलं तर ते दोन घास खाल्याशिवाय परत जात नसे व मुख्य म्हणजे खाणाराच्या ते स्मरणात रहात असे . मग त्याला ते शिकण्याची आस लागे अशी सुग्रण आई होती माझी .
तिला शिकवायला पण फार आवडायचं . ते शिकवत असतांना अनेक टीप्स द्यायची ती 2/3 वेळेला शिस्तीत समजून ते सांगत असतांना काय करु नये तसं केलं तर पदार्थ कसा बिघडतो हे तिच्या खास शैलीत हसतखेळत सांगायची की शिकणाराला ते अगदी लक्षात रहायचं . मायाळु होती तसेच शिस्तीचा दंडूका पण होता तिच्याकडे मजा घेत शिकायचं असं पाककलेचं शास्त्र शिकवणारं जगातलं भारी विद्यापीठ होतं ते .
वारसाहाक्काने आईच्या पाककलेबरोबर शब्दभांडारपण माझ्यातच नव्हे तर तिच्याकडून शिकणा-या प्रत्येकात आलं आहे . मुली , नातींमध्ये तर भिनलय ते .
कोणतीही वस्तू भाजतांना किंवा तळतांना त्याला आच कशी द्यावी म्हणजे तो पदार्थ कसा
" खमंग "
होतो , कमी आच झाली तर कसं कच्च होतं तर
"फराफरा स्टोव्ह किंवा गॕस " सोडला तर कशी
"राखुंडी"
होते हे ती सांगायची .
पोळी कशी
" आलवार लाटावी " लाटताना
" खटांगखटांग "
आवाज करु नये किंवा भाकरी कशी
" न्ह्याsssर"
थापावी
" गौ-या बडवू नयेत "
पचल्याशिवाय उलथणाने उलटू नये असं सरळ न सांगता
" लगेच खुरप खुपसू नये "
असं म्हणायची . पोळी/भाकरी फार पातळ केली तर
" पापड किंवा पानगी "
झाली म्हणायची तर जास्त जाड झाली तर
" दुपटी बडवून ठेवली "
असं म्हणायची .
कोणतीही वस्तू भाजतांना ती हलवण्याचं कौशल्य पणाला लागायचं तिच्यासमोर . सुरवातीला मोठा गॕस मग भाजतांना जरा
"हात सरासरा हालवावा "
" टराटरा " भाजायचं नाही
" टाँगटाँग " आवाज करायचा नाही . भाजत भाजत वस्तू हलकी होते हालवतांना तसं जाणवतं . अशा खास ठेवणीतले शब्दप्रयोग , वाक्यप्रचार असायचे तिचे . नंतर नंतर तिला दिसणं कमी झालं होतं तर वस्तूच्या वासावरुन व ती हलवतांना जाणवणा-या हलकेपणावरुन ती भाजल्याचं तिला ओळखता यायचं . मग मंद आचेवर भाजून गॕस बंद करुन तसंच ठेवले की वस्तू
" खमंग "
होते . असं भन्नाट गणित होतं तिचं .
असे प्रत्येक कृतीसाठी
" आडीच घरं तिरके चालणारे "
शब्द वापरायची . त्यात दबाव किंवा कुजकेपणाचा लवलेश नसायचा . गंमतजंमत करत शिक्षण असायचं ते . तिच्याकडून 100% मार्क मिळवायचे म्हणजे भरुन पावल्यासारखं वाटायचं . तिच्या वयाच्या बायकांपासून अगदी परवापरवापर्यंत आकांक्षाकडून सुद्धा सुग्रणपणाचे धडे तिने गिरवून घेतलेत . या सगळ्या बिघडलेल्या पदार्थांना किंवा करण्याच्या चुकीच्या पद्धतीला तिचा खास शब्दप्रयोग होता.
" उंडग्याचा येभाव "
तो आमच्याकडे प्रसिद्ध आहे अगदी भाजी मोठी चिरलेली दिसल्यावर मी नुसतं शोभा म्हणून हाक मारली की ती हसत विचारते
" वैनी येबाव झाला का हो "
तिच्या सुग्रणपणाबरोबर तिचे खास शैलीतील शब्द भांडार पण मला माझ्यातच नव्हे तर आम्हा सगळ्यात असल्याचे जाणवते व मग जात्यावर बसली की ओवी आठवते तस प्रसंगानुरुप तिचे शब्द ओघाने येतात .
सध्या लाॕकडाऊनमुळे घरात रोज पाककलेचे ज्ञान पाजळलं जातंय त्या निमित्ताने आईची प्रकर्षाने आठवण होते . माझ्या लहानपणी ती तरुण होती . गोंडाळ शरिरयष्टी , गोरा रंग , आंबाडा , नऊवारी साडी आणि समाधानी सात्त्विक वृत्ती . डावा गाल थोडासा वर उचलत हसण्याची लकब होती तिची . खेड्यात रहाणं होतं शेती त्या अनुषंगाने येणारा राडा , जनावरांचा राबता असे असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत तिचं ठरलेलं असायचं . केस पुसायला पांढरा स्वच्छ पंचाच असायचा तर शक्यतो मलमलचे पांढरे ब्लाऊज घालण्यावर भर असे . गबाळेपणा , आळशीपणा तिच्या आसपास फिरकत नसे . प्रसंगानुरुप निटनेटकं , प्रसन्न रहायचा शिरस्ता होता तिचा . तसंच खाण्यात पण चविष्ट , सात्त्विक असलं पाहिजे . काका गेल्यानंतर पुढे आठ वर्षे होती ती पण फार समजुतीनं आणि धोरणानं वागणे होतं तिचं . नाविण्याची आस असल्यामुळे अगदी नातवंडांबरोबर तिचे मित्रत्वाचे संबध होते . जुनाट विचार तिला स्पर्श पण करत नसत . आई म्हणजे असं भन्नाट व्यक्तिमत्त्व होत.
आशिषचे लग्न जमल्यापासून क्षणोक्षणी तिची आठवण येत राहिली अजूनही येतेय . आत्ता समजा कीर्तीसोबत तिला रहायला मिळालं असतं तर कोण कौतुक वाटलं असतं तिला .
परवा मजा अशी झाली सकाळी मी भाजी करायचे शेजारी कीर्ती पोळ्या करायची गप्पागोष्टी चालू असायच्या हाताबरोबर माझं तोंडही चालू असायचं ( भाजीच्या कृतीसंदर्भात ) आणि तिला पण भाजी केल्याचा फील यायचा . एक दिवस आळूची भाजी करायची होती सगळी तयारी करुन ठेवली व तोंडी कृती सांगून गेले . पण करताना तिला गडबडायला होऊ लागली .10/12 मेसेजेश आले तिचे मला . मग सविस्तर कृती लिहून पाठवली . भाजी छान झाली . मी घरी आल्यावर गप्पा मारत बसलो हसुनहसुन बेजारी .
परत एकदा सांडग्याची भाजी करायची होती . मी करतांना तिने पाहिली होती परत एकदा कृती सांगितली आधी सांडगे तळून घे व त्यातच कांदा फोडणी टाक . मी बाजूला सरकले . कढई जरा जास्त तापली असावी त्यामुळे तेल जास्त तापलं तिने गडबडीने सगळे सांडगे एकदमच त्यात टाकले . मी चहा पीत होते वास आल्यावर पटकन उठून मी सांडगे काढले अन ओघातच म्हणून गेले आग आग
" सांडग्याची राखुंडी झाली बघ "
आणि पुढची कृती सांगून मी
वेळ झाल्यामुळे बँकेत गेले . आम्हांला दोघींनाही अंदाज आला होता पण दुपारी जेवताना आम्ही एकमेकींकडे हळुच पाहिलं व हसत गप्पच बसलो . भाजी ब-यापैकी करपट लागत होती . जेवतांना मनिष पटकन म्हणाला
"वेगळी लागतीय न भाजी "
मग आम्ही हसायला लागलो कीर्तीनं उत्तर दिलं
" आरे सांडग्याची राखुंडी झाली"
मग एकच हाशा पिकला . मग लक्षात आलं की मी शेजारी असले की लक्ष दिलं जातं तिला सांगितले जातं मग आमच ठरलं की सगळी तयारी करुन ठेवायची पण मी गेल्यावर तिने भाजी करायची . व भाजी करत असतांना मोबाईल बाजूला ठेवायचा . आणि आजून एकदा सांडग्याची भाजी तिने करायची.
पुन्हा एकदा भाकरी करता करता पीठ घट्ट झाल्याने भाकरी पसरेचना चांगलीच जाड झाली पटकन मी म्हणून गेले पीठाला थोडेसे पाणी लावायला हवं होतंस पीठ घट्ट झालंय आणि भाकरी झाल्यावर हातात धरुन
" आगं दुपटं झालंय हे "
असं सहजच बोलून गेले .
असे आईचे शब्द ओघाने येत रहातात मग कीर्ती विचारत रहाते
" म्हणजे काय "
मग तिला विस्ताराने आजीचा किस्सा सांगावा लागतो . अच्छा असं आहे काय म्हणत ती चूक सुधारण्याचा प्रयत्न असतो तिचा . पुढच्या भाकरी मात्र चांगल्या जमल्या .
असे मधूनमधून काही किस्से घडतात . पुढे 1/2 दिवस चघळायला तो विषय असतो आमच्याकडे . मग परवा कीर्तीच म्हणाली बिघडलेल्या केकचं वर्णन ऐकायला आणि पुन्हा पुन्हा वाचायला व आठवायला मजा येते . राखुंडी आणि दुपटं तर स्मरणात राहिलच पाहिजे तुम्ही लिहाच मग तिच्या हट्टापायी हा लेखनप्रपंच !!!
क्रमशः भाग 20
कोरोनासह जगणं हळुहळु आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय असं काहीसं सध्याचे वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही . कारण 4 लाॕकडाऊन झाले आणि आता अनलाॕक 1.0 सुरु झालेय . आता पुर्ण अनलाॕकची वाट पहायची त्यासाठी लसीकरण होणे गरजेचे तोपर्यंत कोणीच त्याविषयी काहीच वक्तव्य करु शकत नाही किंवा हमी देऊ शकत नाही हे तितकेच खरे .
इतके दिवस सुरक्षित असलेल्या बार्शीला आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागात नविन रुग्ण सापडू लागले आहेत . चिंता वाढतेय पण लोक आपणहून स्वतःची काळजी घेत आहेत . सोशल डिस्टनसींग , मास्क , सॕनिटायझर हे जिवनाचे अविभाज्य घटक मानत जनजिवन सुरळीत व्हायला लागले आहे . आणि तेच गरजेचे आहे कारण सक्तीपेक्षा स्वेच्छा प्रभावीपणे काम करते . माझी आयुर्वेदीक औषधे परवा मिळाली त्याच्याबरोबर ज्योतींने वेळेत सुचीत केल्याप्रमाणे सगळ्यांसाठी अँटीव्हायरसचा डोस पण मिळाला आहे . त्यामुळे थोडंस निश्चिंत वाटतेय . बाकी उद्योग व आॕफिसेस पण टप्प्याटप्प्यांनी सुरु व्हायला लागले आहेत . IT वाले WFH करु शकतात पण Mech वाल्यांना प्रत्यक्ष जाव लागू शकतं . गेल्या आठवड्यात मनिष म्हणाला कीर्तीच्या एका मैत्रिणीला पुण्यात यायला सांगितले आहे ती रत्नागिरीहून पुण्याला जाईल रविवारी येत्या . कीर्तीला अजून नाही पण 10/12 दिवसात जाव लागू शकतं . ते ऐकुन अचानक मला उगाच पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं . मोहात आडकणे चांगले नव्हे व मोहात आडकवणे त्याहून योग्य नाही . समजते पण उमजत नाही असं काहीसं म्हणावे लागेल . पण लगेचच मी स्वतःला सावरलं .
तसं तर आशिष-आकांक्षा कित्येक दिवसांनी इतके दिवस बार्शीला राहिले यावेळी सोबत कीर्ती आहे .आडीच महिने एकत्र रहायची सवय झाली . माझी जिवनशैली काय होती हे पुर्णपणे विसरलेय मी व सध्याचा दिनक्रम आंगवळणी पडलाय माझ्या . घरकामाचा ताण पडतोय पण सहवासाच्या आनंदापुढे तो फिका वाटतोय . घरात सगळ्यांना कीर्तीने खुप लळा लावला आहे . छान वाटतं सगळे मिळून रहायला हे जरी खरं असलं तरी त्यांच-त्यांच काम , रुटीन सुरु होणे हेही महत्त्वाचेच की !! त्यामुळे मनाला समजावून सांगितले .
आता 1 जुनपासून माझी बँक 10 ते 5 सुरु झाली त्यामुळे पुन्हा आमची जोडगोळी 1 तास कट्ट्यासमोर उभी रहातेय . मुख्य म्हणजे माझी सकाळची धावाधाव कमी झाली .
पाडवा झाला , वैशाखी झाली आता वटपौर्णीमा !
काल ठरल्याप्रमाणे कीर्ती सकाळी 6.30 लाच खाली आली छान आवरुन आम्ही दोघींनी पुजा , आरती , कहाणी 8.30 वाजता सगळं झालं आमचं !! मग कहाणीवर चर्चा , फोटो नेहमीप्रमाणे सुरु . एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या नविन पिढीला सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे , त्यानिमित्ताने जिवनक्रम बदलतो , नविन कपडे घालायला मिळतात , खाण्यात वैविध्य येतं फक्त हे नव्या पिढीला कसं पचनी पडेल त्या पद्धतीने द्यावं हे मात्र घरच्या मोठ्यांच कसब आहे . कारण change of work is rest या उक्तीप्रमाणे कोणतच औडंबर न करता मजा घेत जिवनाची लज्जत वाढवली पाहिजे मग समाधान मिळतं .
परवा कीर्ती म्हणाली लग्नानंतर मी दीड महिना पुण्यात व आडीच महिन्यापासून बार्शीत रहातेय . आगदी काहीही सांगितले तरी मी कुठे काय आहे ते सांगू शकते वर असेल तर घेऊन येऊ शकते फक्त जिन्यात मांजर नसले पाहिजे !!
" मांजर आणि कीर्ती "
हे एक अजब समिकरण आहे . मुली पाल झुरळ पाहून किंचाळतात , पळत सुटतात हे माहित होतं . पण हीला मांजर दिसले की ही पळत सुटते . खुर्चीवर , बेडवर जाऊन उभी रहाते खुप घाबरते . तिला लहानपणी मांजराची भिती बसलेली आहे . बार्शीत तर जिन्यातून , खिडकीतून आसपास ब-यापैकी मांजरांचा वावर आहे . तिची भिती मोडावी म्हणून मी अनेक प्रयोग करतेय . परवा कंपाऊंड वालच्या पीलरवरआंब्याच्या सावलीत मांजर झोपलं होतं . आम्ही सगळे होतो तीला चल पहायला म्हणलं तर लहान मुलं पडायच्या भितीने कसे घट्ट पकडतात तसं पकडून ती बाहेरच्या कट्ट्यावर उभी राहिली. तिला मांजर चालताना बिबट्या चालतो असा भास होतो म्हणाली . मांजर मान कशी करतं पहातं कसं याची मजेदार प्रात्यक्षिके ती करुन दाखवते त्याचबरोबर लहानपणी केतकीने मांजरावरुन कसं ब्लॕकमेल केलं हेही किस्से तिने सांगितले . जसं की तिच्याबरोबर अंगणात यायचं असेल तर केतकीची सायकल काढून ठेवणे , तिच्या वाटणीची कामे हीने करणे अशा गंमती जमती सांगितल्या . बाहिणी-बहिणींची भांडणं आणि प्रेम याला कशाचीच उपमा नाही देता येत हे मात्र खरं .
मग तिला म्हणलं कट्ट्यावर आलीस की मांजर दासते म्हणतेस मग बागकाम कसं करणार ? कारण ती 15 दिवसापासून माझ्या मागे लागलीय आपण भाजी लावू . परवा छान पाऊस झालाय , वातावरण बदललय आता लावू शकतो आपण . मग एकीकडे मी व एकीकडे आकांक्षा ही मध्ये उभी राहून मोठ्या हौसेनी मेथी , कोथिंबीर , वांगी व भेंड्या याच्या बिया लावल्यात . आज सकाळीच कोथिंबीरीचे छान कोंब पण दिसले . पाहू आता कशी भाजी येते मुलांना कितपत खायला मिळते !